शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:23 IST

नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.

ठळक मुद्देहेलिकॉप्टर पोहोचले नाही : पोलीस मदत केंद्रात ठोकावा लागला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.पोलिंग पार्ट्यांना वाहनाने पोहोचविण्याचा धोका लक्षात घेऊन निवडणूक विभागाने त्यांना हेलिकॉप्टरने पोहोचविले होते. या कामासाठी चार हेलिकॉप्टर वापरण्यात आले. पोलीस मदत केंद्राच्या ठिकाणी बेस कॅम्प होते. या मदत केंद्राच्या परिसरातच हेलिपॅड तयार करण्यात आले होते. देसाईगंज, गडचिरोली व अहेरी येथून कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविले जात होते. तेथून मतदान केंद्राच्या गावापर्यंत पोलिंग पार्टीला पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांचा दुपारी ३ वाजताच गाशा गुंडाळण्यात आला. त्यानंतर संबंधित पोलिंग पार्टीला सायंकाळ होण्याच्या आधी बेस कॅम्पपर्यंत पोहोचविण्यात आले.दुसºया दिवशी सकाळी आपण हेलिकॉप्टरने देसाईगंज किंवा अहेरी येथे पोहोचू, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी होती. मात्र हेलिकॉप्टर न आल्याने काही पोलिंग पार्ट्यांना बेस कॅम्पवरील पोलीस मदत केंद्रात थांबावे लागले. सावरगाव, गॅरापत्ती येथील पोलिंग पार्ट्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेस कॅम्पवरच थांबल्या होत्या. त्यामुळे ते कर्मचारी शनिवारी सकाळी पोहोचतील, अशी शक्यता आहे. ज्या पोलीस मदत केंद्रांवर कर्मचारी थांबले होते त्यांची पूर्ण व्यवस्था पोलिसांच्या मार्फत करण्यात आली होती, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वादळ वाºयासह पाऊस झाला. यावेळी बहुतांश कर्मचारी तालुकास्तरावर पोहोचले होते. मात्र वादळ वाऱ्याचा त्रास या कर्मचाºयांना सहन करावा लागला. काही कर्मचाऱ्यांना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे १२ वाजले.आगाऊ फिरविण्यामुळे कर्मचारी त्रस्तनक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. मात्र गाव जवळच असताना त्यांना फेरा मारून संबंधित मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. फेरा मारून नेण्यामागे पोलिसांच्या सुरक्षेच्या रणनितीचा भाग असला तरी १० ते १५ किमीपर्यंत चालून पोलिंग पार्टीतील कर्मचारी व अधिकारी थकले होते. अहेरी तालुक्यातील मरपल्ली हे गाव अहेरीपासून जवळ आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना बसने सर्वप्रथम सिरोंचा येथे नेण्यात आले. त्यानंतर परत मरपल्ली येथे सोडण्यात आले. अनेक कर्मचारी ४० पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांना चांगलाच त्रास झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019