शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

Lok Sabha Election 2019; मोटरसायकल व पायदळ रॅलींनी प्रचाराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:07 IST

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले.

ठळक मुद्देअनेक कर्मचारी केंद्रासाठी रवाना : आजचा दिवस आणि रात्रही महत्वाची

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले. काँग्रेसतर्फे मोटारसायकलवरून तर भाजपने पायदळ रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी निवडणुकीची खलबते मात्र वाढली आहेत. मतदारांना आमिष देऊन आपल बाजुने वळविण्याचे प्रयत्न बुधवारी दिवसभर आणि रात्रभरही सुरू राहणार आहेत. मात्र यावेळी ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी वाढल्यामुळे उमेदवारांची अडचण होत आहे.दरम्यान निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करून मंगळवारी काही संवेदनशिल मतदान केंद्रांवरच्या कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणच्या बेस कॅम्पवर रवाना केले. उद्या ते कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर रवाना होतील. या निवडणुकीच्या कामात संपूर्ण मतदान संघात एकूण ८ हजार २५० कर्मचारी लागणार आहेत. विविध सुरक्षा दलांचा बंदोबस्त लावला आहे.पथकांच्या वाहतुकीसाठी ५८ बसगाड्यामतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या पथकांची ने-आण करण्यासाठी निवडणूक विभागाने ५८ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये गडचिरोली आगाराच्या ४२ तर अहेरी आगाराच्या १६ बसेसचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व त्यांना परत आणण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ९ एप्रिल ते जवळपास १२ एप्रिलपर्यंत बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाने ५६ रुपये प्रतीकिलोमीटर दराने बस उपलब्ध करून दिल्या आहेत.केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागूनिवडणूक भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ९३५ मतदान केंद्रांचे १०० मिटरच्या परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात एकत्रित जमण्यासह विविध प्रकारची बंधने राहणार आहेत.नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे- सिंहमतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर