शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:18 IST

मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी नेमणूक : ४०० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली. त्यामुळे अपवादात्मक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास निम्मे मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. या मतदान केंद्रांवर मतदान घेणे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. हे आव्हान प्रत्येक निवडणुकीच्या वेळी स्विकारून निवडणुका शांततेत पार पाडल्या जातात.नक्षल्यांच्या बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफचे जवान व अधिकारी तैनात आहेत. मात्र निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येक मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागते. त्यांना जंगलातून मतदान केंद्रापर्यंत नेणे व सुखरूप परत आणणे ही जबाबदारी पोलीस जवानांना स्विकारावी लागते. दुर्गम भागातील एका पथकाच्या मागे किमान २५ ते ३० तर वेळप्रसंगी ५० जवान उपलब्ध करून दिले जातात. लोकसभेच्या वेळी जिल्हाभरात एकाच वेळी मतदान होत असल्याने जिल्ह्यात जरी १० हजार पोलीस असले तरी हा पोलीस दल कमी पडतो. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व सुमारे ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. १० हजार कर्मचाºयांमध्ये प्रशिक्षण घेणाºया महिला पोलीस, होमगार्ड यांचाही समावेश होता. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी या जवानांना गडचिरोली जिल्ह्यात डेरेदाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना मतदानाच्या अगोदरच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. या कर्मचाºयांच्या सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील यावर्षीची लोकसभेची निवडणूक अपवाद वगळता अतिशय शांततेत पार पडली.गडचिरोलीकरांनीही आपलेसे करून घेतलेगडचिरोली शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बाहेरच्याच पोलीस कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक केली होती. त्यांची बोलीभाषा व चेहºयावरून ओळख पटत होती. सगळीकडे बाहेरचेच पोलीस कर्मचारी दिसत असल्याने निवडणुकीसाठी त्यांची नेमणूक झाली असल्याचा अंदाज गडचिरोलीकरांना आला. काही मतदारांनी जवानांचे नाव, गाव विचारून तेथील राजकीय परिस्थिती विचारली. यातून भावनिक नाते निर्माण होण्यास मदत झाली. हे सर्व कर्मचारी तीन ते चार दिवस गडचिरोली येथे थांबले होते. निवडणुकीच्या दुसºया दिवशी या सर्वांना निरोप देण्यात आला. या सर्व कर्मचाºयांना स्वतंत्र बसने गडचिरोली येथे आणण्यात आले होते.शहरी भागातील मतदान केंद्रांवर नेमणूकनक्षलग्रस्त भागातून प्रवास करताना पोलीस कर्मचाºयांना युध्द कौशल्य वापरावे लागते. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पोलीस जवानांना हे कौशल्य प्राप्त नाही. तसेच त्यांना येथील भौगोलिक, सांस्कृतिक व नक्षलवादाविषयी माहिती नाही. त्यामुळे त्यांची दुर्गम भागात नियुक्ती करणे धोक्याचे ठरले असते. ही बाब लक्षात घेऊन नवख्यांना गडचिरोली, देसाईगंजा, चामोर्शी, आरमोरी यासारख्या तालुकास्तरावर नेमणूक देण्यात आली. त्यांच्या बोलीभाषेवरून ते कोकण, मराठवाडा येथील असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019