शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आता ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:23 IST

विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले. महाराष्ट्राच्या नकाशात नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने केलेले विक्रमी मतदान इतर जिल्ह्यातील मतदारांच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे.अतिशय विपरित परिस्थिती, पदोपदी नक्षलवाद्यांकडून असलेली जीवाची भिती याला न जुमानता भर उन्हात अनेक किलोमीटर पायी चालत जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याची हिंमत या सामान्य आदीवासींमध्ये कुठून आली? आतापर्यंतच्या सरकारांनी असे काय त्यांना दिले की ते आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी एवढे प्रेरित झाले?खरं सांगायचं तर आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारांनी या आदिवासींना खºया अर्थाने न्याय दिलेला नाही. त्यांच्या नावावर आलेल्या कोट्यवधीच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचल्या नाही. हे लोक वर्षानुवर्षे ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थितीत आजही आहेत. सरकारी योजना तर सोडा, पण आम्हाला मतांचे दान करा, अशी मागणी करायला निवडणुकीतील उमेदवारही दुर्गम भागातल्या गावांमध्ये पोहोचले नाहीत. मग असे असताना मतदानाबद्दलची जागरूकता या भाबड्या आदिवासींमध्ये कुठून आली? या प्रश्नाचा माग खरं तर प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच घ्यायला पाहिजे. या प्रश्नात डोकावल्यास एक गोष्ट जरूर लक्षात येईल, ती म्हणजे काही मिळाले म्हणून नाही, तर काहीतरी मिळेल या आशेने हे आदिवासी आपले सरकार, आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी उत्सुक आहेत. नक्षलवाद्यांच्या बंदुकीतून नाही तर लोकशाही प्रक्रियेतून निवडले जाणारे सरकारच आपल्याला न्याय देईल, एक दिवस आपल्यालाही ‘अच्छे दिन’ पहायला मिळतील, ही त्यांची आशा अजूनही कायम आहे, हेच या मतदानावरून दिसून येते.आजपर्यंत आम्हाला काही मिळाले नाही, आम्ही मतदान करून काही फायदा नाही, निवडणुकीवर आमचा बहिष्कार, असा पवित्रा या दुर्गम भागातील आदिवासींनी घेतला असता तर प्रशासन किंवा कोणीच त्यांचे काही बिघडवू शकले नसते. पण तसे न करता २४ तास नक्षलवाद्यांच्या दहशतीत वावरत असतानाही निवडणुकीत सहभागी न होण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावून लावणाºया या आदिवासींच्या हिमतीला नक्कीच दाद द्यावी लागेल. त्यांचा दुर्दम्य आशावाद किती प्रबळ आहे हेसुद्धा यातून दिसून येते.मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनानंतर मुंबईकर थांबले नाहीत, लगेच दुसºया दिवशी आपापल्या कामाला लागले. त्यावेळी मुंबईकरांच्या त्या हिमतीचे सर्वत्र कौतुक झाले, पण त्यामध्ये त्यांच्या हिमतीसोबतच पोटापाण्याचाही प्रश्न होता. मुंबईत जो थांबला तो संपला असे म्हणतात. पण गडचिरोलीतील आदिवासी नक्षल दहशतीतही पोटासाठी नाही तर राष्ट्रीय कर्तव्यासाठी घराबाहेर पडत असतील तर त्यांची हिंमत मुंबईकरांपेक्षा मोठी आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पदोपदी मृत्यूचे भय दिसत असताना न डगमगता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवून केवळ उद्याच्या उज्वल भवितव्याच्या आशेवर ते राष्ट्रीय कर्तव्य बजावतात. यामुळेच त्यांच्यासाठी ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ असे वाक्य तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019