शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Lok Sabha Election 2019; आता ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:23 IST

विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले. महाराष्ट्राच्या नकाशात नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने केलेले विक्रमी मतदान इतर जिल्ह्यातील मतदारांच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे.अतिशय विपरित परिस्थिती, पदोपदी नक्षलवाद्यांकडून असलेली जीवाची भिती याला न जुमानता भर उन्हात अनेक किलोमीटर पायी चालत जाऊन मतदानाचा हक्क बजावण्याची हिंमत या सामान्य आदीवासींमध्ये कुठून आली? आतापर्यंतच्या सरकारांनी असे काय त्यांना दिले की ते आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी एवढे प्रेरित झाले?खरं सांगायचं तर आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारांनी या आदिवासींना खºया अर्थाने न्याय दिलेला नाही. त्यांच्या नावावर आलेल्या कोट्यवधीच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचल्या नाही. हे लोक वर्षानुवर्षे ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थितीत आजही आहेत. सरकारी योजना तर सोडा, पण आम्हाला मतांचे दान करा, अशी मागणी करायला निवडणुकीतील उमेदवारही दुर्गम भागातल्या गावांमध्ये पोहोचले नाहीत. मग असे असताना मतदानाबद्दलची जागरूकता या भाबड्या आदिवासींमध्ये कुठून आली? या प्रश्नाचा माग खरं तर प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच घ्यायला पाहिजे. या प्रश्नात डोकावल्यास एक गोष्ट जरूर लक्षात येईल, ती म्हणजे काही मिळाले म्हणून नाही, तर काहीतरी मिळेल या आशेने हे आदिवासी आपले सरकार, आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी उत्सुक आहेत. नक्षलवाद्यांच्या बंदुकीतून नाही तर लोकशाही प्रक्रियेतून निवडले जाणारे सरकारच आपल्याला न्याय देईल, एक दिवस आपल्यालाही ‘अच्छे दिन’ पहायला मिळतील, ही त्यांची आशा अजूनही कायम आहे, हेच या मतदानावरून दिसून येते.आजपर्यंत आम्हाला काही मिळाले नाही, आम्ही मतदान करून काही फायदा नाही, निवडणुकीवर आमचा बहिष्कार, असा पवित्रा या दुर्गम भागातील आदिवासींनी घेतला असता तर प्रशासन किंवा कोणीच त्यांचे काही बिघडवू शकले नसते. पण तसे न करता २४ तास नक्षलवाद्यांच्या दहशतीत वावरत असतानाही निवडणुकीत सहभागी न होण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावून लावणाºया या आदिवासींच्या हिमतीला नक्कीच दाद द्यावी लागेल. त्यांचा दुर्दम्य आशावाद किती प्रबळ आहे हेसुद्धा यातून दिसून येते.मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनानंतर मुंबईकर थांबले नाहीत, लगेच दुसºया दिवशी आपापल्या कामाला लागले. त्यावेळी मुंबईकरांच्या त्या हिमतीचे सर्वत्र कौतुक झाले, पण त्यामध्ये त्यांच्या हिमतीसोबतच पोटापाण्याचाही प्रश्न होता. मुंबईत जो थांबला तो संपला असे म्हणतात. पण गडचिरोलीतील आदिवासी नक्षल दहशतीतही पोटासाठी नाही तर राष्ट्रीय कर्तव्यासाठी घराबाहेर पडत असतील तर त्यांची हिंमत मुंबईकरांपेक्षा मोठी आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पदोपदी मृत्यूचे भय दिसत असताना न डगमगता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवून केवळ उद्याच्या उज्वल भवितव्याच्या आशेवर ते राष्ट्रीय कर्तव्य बजावतात. यामुळेच त्यांच्यासाठी ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ असे वाक्य तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019