शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:08 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहेरी उपविभागात घटले : पाच मतदारसंघात वाढले, सरासरी गेली ७१.७७ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. काही मतदान केंद्रावरचे कर्मचारी मुख्यालयी पोहोचणे बाकी आहेत. ते पोहोचल्यानंतरच त्यांच्या केंद्रावरील मतदानाचा आकडा घेऊन निश्चित टक्केवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नक्षल घटनांच्या पार्श्वभूमीवर वाढलेले हे मतदान लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वाढविणारे ठरले आहे.या लोकसभा मतदार २०१४ च्या निवडणुकीत ६९.९५ टक्के मतदान झाले होते. तो आकडा यावेळी पार करून मतदान ७२ टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे. यात अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. परंतू अहेरी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसक घटनांमुळे, तसेच एटापल्ली तालुक्यात ४ मतदान केंद्र सुरूच झाले नसल्यामुळे मतदानाचे प्रमाण घटले. मतदानापासून वंचित राहिलेल्या त्या चार केंद्रांवरील नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळाल्यास या क्षेत्रातील मतदानाचा आकडा आणखी वाढू शकेल.एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या दक्षिणेकडील चार तालुक्यांसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची, कुरखेडा या तालुक्यांतही नक्षलवाद्यांचे सावट आहे. नक्षलवाद्यांचा मतदान प्रक्रियेला विरोध असतो. तरीही त्या भागात मतदानाचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येते. यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यातही प्रशासनाने कसर सोडली नाही. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019