शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:32 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत सर्वत्र खल : आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे. आमचाच उमेदवार १०० टक्के विजयी होणार, असा दावा आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाची जागा जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना व काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विजयश्री खेचून आणण्यासाठी युती व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ११ ते १२ दिवस जीवाचे रान करून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. कमकुवत भागात अधिक बैठका घेऊन गठ्ठामते आपल्या पदारात पाडून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र मतदार राजाची मेहरबानी कोणत्या उमेदवारावर होणार आहे. हे २३ मे च्या निकालानंतरच कळणार आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसकडून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, बसपाकडून हरिश्चंद्र मंगाम, एपीआयकडून देवराव नन्नावरे व वंचित आघाडीतर्फे डॉ. रमेशकुमार गजबे हे पाच उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. या पाचपैकी काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होती. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. स्थानिक स्तरासह राज्य व राष्टÑीय पातळीवरील पॉझिटीव्ह व निगेटीव्ह मुद्दे कार्यकर्त्यांनी मतदारांना पटवून दिले. शेवटी मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.सर्वच स्रोतांकडून घेतली जात आहे माहितीयुती व आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागात सक्रीय आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाच्या वतीने प्रतिनिधीही ठेवण्यात आले. शिवाय गावपाटील व काही खास कार्यकर्त्यांकडे निरिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह शहरी भागातील पदाधिकारी तसेच गुप्त विभाग, राजकीय विश्लेषक व इतर स्त्रोतांकडून मतांची माहिती घेतली जात आहे. इतर तीन पक्षाच्या उमेदवारांच्या मताचा कोणावर कसा फरक पडेल, याबाबत चर्चेत मंथन केले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019