शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

गेवर्धा येथील विश्रामगृहाची दुरवस्था

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत.

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत. विश्रामगृह दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेवर्धा येथे विश्रामगृह बांधले आहे. यापरिसरात येणारे अनेक शासकीय अधिकारी या ठिकाणी मुक्कामास राहत होते. मात्र २६ जानेवारी २००६ रोजी गणतंत्रदिनी नक्षल्यांनी हे विश्रामगृह जाळून टाकले. तेव्हापासून या विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात न आल्याने विश्रामगृह मोडकळीस आले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. इमारतीवरील कवेलू फुटले आहेत. लाकडी फाट्यांनी वाळवी लागली आहे. सततच्या पावसामुळे फाटे कुजण्याच्या मार्गावर आहेत. नक्षल्यांनी आग लावल्यानंतर विश्रामगृहातील आतील भाग जळाला. त्यामुळे भिंती काळवंटल्या आहेत. या विश्रामगृहाची साफसफाई केली जात नसल्याने सगळीकडे घाण पसरली आहे. इमारतीची डागडुजी केल्यास इमारत राहण्यासाठी कामी येऊ शकते. गेवर्धा येथे असलेले विश्रामगृह गेवर्धावासीयांसाठी एक अभिमानाची बाब होती. कुरखेडा परिसरात आलेले अधिकारी किंवा कर्मचारी सायंकाळी उशीर झाल्यानंतर याच ठिकाणी मुक्कामाने राहत होते. विश्रामगृहात राहण्याच्या निमित्याने नेहमी अधिकारी येत असल्याने गेवर्धावासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली होती. मात्र विश्रामगृह जळाल्यानंतर गेवर्धा येथे अधिकाऱ्यांचे येण्याचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. आणखी काही दिवस या इमारतीची डागडुजी करण्यास विलंब झाल्यास इमारतीचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डागडुजीसाठी अत्यंत कमी खर्च येणार असतांनाही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर इमारतीची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी. जेणे करून या परिसरात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशाच प्रकारच्या जिल्हाभरातील शेकडो इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे.