शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कोरोनाच्या प्रतिबंधासाठीच ‘लॉकडाऊन’ गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतु, यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हाच आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन : जबाबदार नागरिक म्हणून घरातच राहावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात पसरतो. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये व सर्वांनी आहे त्याच ठिकाणी राहणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, सर्वसामान्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडत आहे. तो म्हणजे लॉकडाऊन म्हणजे काय, लॉकडाऊन कशासाठी, याची गरज काय, याची उत्तरे नागरिकांनी समजावून घेणे अत्यावश्यक आहे. जबाबदार नागरिक म्हणून घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.सार्वजनिक वावर बंद करून जो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजेच लॉकडाऊन. परंतु, यामध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. आजच्या परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हाच आहे.लॉकडाऊनची गरज का हे अ आणि ब व्यक्तीच्या उदाहरणावरून समजून घेता येते. अ व्यक्ती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरच परदेशातून घरी परत येतो. विमानतळावर सर्व परदेशी प्रवाशांना होम क्वॉरंन्टाईन करण्यासाठी माहिती घेऊन प्रशासन होम क्वॉरंन्टाईनचा शिक्का मारतो. १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जातात. या प्रक्रियेतून अ व्यक्ती जातो आणि घरी जाऊन १४ दिवस स्वत:ला वेगळ्या खोलीमध्ये राहण्याचा निर्धार करतो. परंतु, अ व्यक्तीची आई-बाबा, पत्नी, मुले त्याच्यावर रागावून विचारणा करते, खूप दिवसांनी परदेशातून आला आहेस. पण असा वेगळ्या खोलीमध्ये कशाला राहतोस? सर्वांसमवेत का बर राहत नाही? जेवणही आमच्यासोबत करत नाही? तुला काही होणार नाही तू बाहेर ये आणि आमच्या सोबतच राहा. यावर अ व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगतो की, मी कोरोना बाधित देशातून आलो. १४ दिवस होम क्वॉरंन्टाईन केले आहे. त्यामुळे मी इतर कोणत्याच व्यक्तीसोबत संपर्कात येणार नाही. याची परिपूर्ण दक्षता घेईन, अशी भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळेही असाच संसर्ग होण्याचा धोका आहे.माहिती लपविणे घातकलॉकडाऊन केले नाही तर जेव्हा हजारो आजारी पडतील त्याच वेळेस ही बाब माहिती होईल. त्यामुळे कोणत्या घरात आजारी कोण पडले आहे, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. त्यामुळे माहिती लपविल्यास व्यक्ती, कुटुंब व समाजासाठी ही बाब घातक ठरू शकते. परिस्थिती गंभीर असून शिस्तीने घरी राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या