शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्ह्यात २३ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध घालण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत कमतरता : घरी राहत असल्याचा परिणाम; मार्च व एप्रिल महिन्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनामुळे मार्चच्या शेवटी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी याच काळातील गुन्ह्यांची तुलना केल्यास गंभीर गुन्हे २३ टक्क्यांनी घटल्याचे पोलीस विभागाने घेतलेल्या नोंदीवरून दिसून येते. असे असले तरी पोलिसांवरचा ताण मात्र कायम असून त्यांना विविध पातळ्यांवर ड्युटी करावी लागत आहे.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध घालण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असल्याचे दिसून येते. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी आदी गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जातात. मार्च २०१९ मध्ये अशा प्रकारचे ३४ तर एप्रिल २०१९ मध्ये १८ असे एकूण ५२ गुन्हे घडले होते. मार्च २०२० मध्ये १८ तर एप्रिलमध्ये २४ गुन्हे असे एकूण ४२ गुन्हे घडले आहेत. मागील वर्षीच्या मार्च व एप्रिल महिन्यामधील गुन्ह्यांची या वर्षातील याच महिन्यांतील गुन्ह्यांशी तुलना केली असता, गुन्ह्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असल्याचे दिसून येते. मार्च व एप्रिल २०२० मध्ये खुनाचे चार गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे सात गुन्हे, बलात्काराचे सात गुन्हे, घरफोडी सहा, तर चोरीचे १८ गुन्हे घडल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश नागरिक घरीच राहात होते. तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात व्यस्त राहात होते. त्याचबरोबर घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने नागरिक सहजासहजी घराबाहेर पडत नव्हते.उन्हाळ्याच्या कालावधीत मुलांना सुट्या राहात असल्याने काही नागरिक फिरण्यासाठी जातात. या संधीचा गैरफायदा उचलून उन्हाळ्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. यावर्षी मात्र नागरिक घरीच असल्याने घरफोडीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येते.विनयभंग, दारूबंदीच्या कारवाया वाढल्याइतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी विनयभंगाच्या घटनांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाली असल्याचे दिसून येते. यावर्षी विनयभंगाच्या मार्चमध्ये १० तर एप्रिलमध्ये ७ अशा एकूण १७ घटना घडल्या. तर मागील वर्षी मार्चमध्ये विनयभंगाच्या ३ आणि एप्रिलमध्ये केवळ एकच घटना घडली होती.गेल्यावर्षी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये मार्च महिन्यात १३४ तर एप्रिल महिन्यात ८६ गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात दारूबंदीच्या कारवाया वाढल्या. मार्च महिन्यात १५१ तर एप्रिल महिन्यात दारूबंदीच्या १६७ कारवाया करून गुन्हे नोंदविण्यात आले.गेल्यावर्षी मे महिन्यात ११४ गुन्हे दाखलमागील वर्षी मे महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, चोरी, विश्वासघात, ठकबाजी, दुखापत, विनयभंग, हयगयीच्या कृत्याने मृत्यू आदी घटनासंदर्भात ११४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७८ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आले. जुगार प्रतिबंधक कायदा, मुंबई दारूबंदी कायदा व इतर भादंवि अन्वये १० गुन्हे असे एकूण ७७ गुन्हे दाखल केले. यावर्षी संपूर्ण मे महिनाभर लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या फिरण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध होता. मे महिन्याचा गोषवारा पोलीस विभागाकडे उपलब्ध झाला नसला तरी मे महिन्यातील गुन्ह्यांमध्येही यावर्षी मोठी घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस