शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

सेंद्रिय शेतीने पिकांना जीवदान

By admin | Updated: December 14, 2015 01:43 IST

कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही,....

कडधान्य पिके जोमात : ढगाळ वातावरणाच्या कचाट्यातूनही बचावलेवैरागड : कडधान्यांच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांना भांबावून सोडत असतानाच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कडधान्य पीक होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी कडधान्य पिकाची पेरणी सेंद्रिय खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी केल्याने ढगाळ वातावरणाच्या कचाट्यात सापडूनही पिकांना जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात तूर पिकासह उडीद, मूग, पोपट, वाटाणा, चना, मसूर, भूईमूग आदी कडधान्य व तैलवर्गीय पिके घेतली जातात. यंदा सदर पिकांची नदी, नाले, ओढ्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व पिकासाठी पाण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणीही शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केली आहे. मागील पंधरवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या पिकांवर वातावरणाचा परिणाम होईल की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु रबी हंगामातील पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक बहरत आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)