शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

विजेच्या लपंडावाने उन्हाळी पीक धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धान पीक घेतले जाते. आता उन्हाळी धान पिकाचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी धान ...

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धान पीक घेतले जाते. आता उन्हाळी धान पिकाचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी धान पिकाला मोटार पंपद्वारे पाणी भरण्याच्या कामात आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने धान पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा व तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर सर्वसामान्य लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोरोना काळात उकाड्यापासून बचाव करण्यासाठी लोक कुलर व पंखे सुरू करून घरात राहत असताना दिवसातून अनेक वेळा विजेचा लपंडाव व वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उकाड्याने नागरिकांचे व लहान मुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी त्रस्त असून वीज वितरण कंपनीच्या कारभार विराेधात रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने सुविधा पुरवावी, अशी मागणी प्रहारचे निखिल धार्मिक यांनी केली आहे.

बाॅक्स

पाणी देण्यासाठी शेतकरी करतात जागल

आरमोरी तालुक्यात पाण्याच्या सुविधेचा अभाव असल्याने डोंगरगाव (भु.) व अन्य गावातील शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतात विहिरी खोदून विहिरीवर धान पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप लावून पाण्याची सोय केलेली आहे. परंतु डोंगरगाव व तालुक्यातील इतर गावातील वीजपुरवठा दिवसा तर कधी रात्री केव्हाही खंडित होऊन ३-४ तास वीजपुरवठा बंद राहताे. विहिरीवर वीजपंप बसवून सुद्धा धान पिकाला पाणीपुरवठा बरोबर होत नाही. त्यामुळे धान पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. विजेच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री केव्हाही जाऊन धान पिकाला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते.