शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचपेक्षा अधिक गुन्ह्यांत अडकलेल्यांना तडीपार करू

By admin | Updated: January 29, 2016 04:29 IST

जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक

वैरागड : जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असेल, अशांना तडीपार करण्याची कारवाई जिल्हा पोलीस प्रशासन करेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे तुकाराम विद्यालयाच्या प्रांगणात महिला व्यसनमुक्ती तथा दारूबंदी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट होते. उद्घाटन प्राचार्य पी. आर. आकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग, शुभदा देशमुख, जि. प. सदस्य सविता वाटगुरे, पं. स. सदस्य कविता दडमल, महादेव नाकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, सरपंच चंद्रकांत चौके, उपसरपंच दमयंती सहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण आकरे, गजानन कुमरे, फाल्गुण नारनवरे, दत्तात्रय क्षिरसागर, नुसाराम कोटांगले, टिकाराम मांदाळे, भाग्यवान टेकाम उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, दारूचे गुन्हे असणाऱ्या लोकांवर गुन्हा सिद्ध होण्यासाठी विलंब होतो, तेव्हा पोलिसांनी पकडलेली दारू तपासणीसाठी जिल्ह्यात फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुविधा निर्माण केली जाणार असून गावातील महिला अवैध दारू पकडून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवतील. त्यांना जाण्या-येण्याच्या खर्चाची तरतूदही केली जाणार आहे. दारू पकडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार दखल घेत नसतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कट्रोल रूममवर संपर्क करा, अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कढोली आणि परिसरातील दारूबंदी समितीच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आपल्या समस्या सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत चौके यांनी केले. संचालन प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. (वार्ताहर)दारूबंदीसाठी पोलिसांवर निर्भर राहू नका- राणी बंग४या कार्यक्रमात बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, समाजात वाईट व्यसनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात समाजाची विनाशाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केवळ पोलीस दारूबंदी करतील, यावर निर्भर न राहता, दारूबंदीसाठी महिला व पुरूषांनी पुढे येऊन गावाची वाईट गोष्टींपासून सोडवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.व्यसनमुक्ती मेळाव्याला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मंचावर पी. आर. आकरे, डॉ. राणी बंग, जीवन नाट, अभिजीत फस्के.