शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाचपेक्षा अधिक गुन्ह्यांत अडकलेल्यांना तडीपार करू

By admin | Updated: January 29, 2016 04:29 IST

जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक

वैरागड : जिल्ह्यात दारूबंदी असताना जे लोक दारूचा व्यवसाय करीत असतील आणि त्यांच्यावर पोलिसात पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असेल, अशांना तडीपार करण्याची कारवाई जिल्हा पोलीस प्रशासन करेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे तुकाराम विद्यालयाच्या प्रांगणात महिला व्यसनमुक्ती तथा दारूबंदी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट होते. उद्घाटन प्राचार्य पी. आर. आकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग, शुभदा देशमुख, जि. प. सदस्य सविता वाटगुरे, पं. स. सदस्य कविता दडमल, महादेव नाकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, सरपंच चंद्रकांत चौके, उपसरपंच दमयंती सहारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण आकरे, गजानन कुमरे, फाल्गुण नारनवरे, दत्तात्रय क्षिरसागर, नुसाराम कोटांगले, टिकाराम मांदाळे, भाग्यवान टेकाम उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, दारूचे गुन्हे असणाऱ्या लोकांवर गुन्हा सिद्ध होण्यासाठी विलंब होतो, तेव्हा पोलिसांनी पकडलेली दारू तपासणीसाठी जिल्ह्यात फिरत्या वैज्ञानिक प्रयोग शाळेची सुविधा निर्माण केली जाणार असून गावातील महिला अवैध दारू पकडून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवतील. त्यांना जाण्या-येण्याच्या खर्चाची तरतूदही केली जाणार आहे. दारू पकडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार दखल घेत नसतील तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कट्रोल रूममवर संपर्क करा, अवैध दारूविक्रेत्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कढोली आणि परिसरातील दारूबंदी समितीच्या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आपल्या समस्या सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत चौके यांनी केले. संचालन प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. (वार्ताहर)दारूबंदीसाठी पोलिसांवर निर्भर राहू नका- राणी बंग४या कार्यक्रमात बोलताना डॉ. राणी बंग म्हणाल्या की, समाजात वाईट व्यसनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात समाजाची विनाशाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केवळ पोलीस दारूबंदी करतील, यावर निर्भर न राहता, दारूबंदीसाठी महिला व पुरूषांनी पुढे येऊन गावाची वाईट गोष्टींपासून सोडवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.व्यसनमुक्ती मेळाव्याला मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मंचावर पी. आर. आकरे, डॉ. राणी बंग, जीवन नाट, अभिजीत फस्के.