शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

शेतकऱ्यांच्याही घरात दिवाळीला लक्ष्मी येऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:47 IST

संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही.

ठळक मुद्देदिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपन्नता, भरभराट, मांगल्य आणि आनंदाचे प्रतिक असलेला दिवाळी सण अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपला आहे. पण दिवाळीचे एखादेही प्रतिक यावर्षी शेतकºयांच्या वाट्याला येण्यासारखी स्थिती सध्यातरी नाही. धानाचे पीक गेल्यावर्षीपेक्षा थोडे बरे आहे, पण धान किंवा कापसाचे एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. कधी सुरू करणार याचा थांगपत्ता नाही. अशा स्थितीत दिवाळीला खºया अर्थाने शेतकºयांच्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्हं नाही. तरीही कोणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी अस्वस्थ होताना दिसत नाही.खरीपातील हलका धान कापून मळणीला सुरूवात झाली आहे. मध्यम धानाची कापणी सुरू आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी पुढील आठ दिवसात मळणी होऊन धान विक्रीसाठी तयार केला जाईल. शासनाने हमीभाव जाहीर केले, पण खरेदी केंद्रच सुरू झाले नाही तर त्या भावाने धान घेणार कोण? शेवटी शेतकºयांना कमी भावाने आपला धान व्यापाºयांच्या घशात घालावा लागेल. उत्पादन खर्चाच्या दिड पट भाव देण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाचा सत्ताधाºयांना विसर पडला असला तरी थोडीफार भाववाढ देऊन सरकारने शेतकºयांवर मेहरबानी केली आहे. पण या भावाचा फायदा व्यापाºयांऐवजी शेतकºयांना मिळण्यासाठी धान खरेदी केंद्र येत्या आठवडाभरात सुरू करणे गरजेचे आहे.आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाºया सहकारी संस्थांचे कमिशन दिले नसल्याने त्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आदिवासी विकास खातेही आहे. त्यांचा मतदार संघ आदिवासीबहुल आहे. त्यांनी हा विषय मार्गी लावून आपल्या संवेदनशिलतेचा परिचय देणे अपेक्षित आहे.ग्रामीण भागात अलिकडे सुरू करण्यात आलेले भारनियमनही शेतकºयांच्या जीवावर उठले. आधीच जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा नाहीत. ज्या काही मोजक्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पाणी महावितरण कंपनीने भारनियमन करून अडविणे सुरू केले होते. खासदार अशोक नेते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उर्जामंत्र्यांचे कान टोचल्यानंतर भारनियमनाचे वेळापत्रक बदलविले. कायम निसर्गाच्या कृपेवर विसंबून राहणाºया बळीराजाला प्रत्येक लोकप्रतिनिधीने किमान अशा कृतीतून तरी दिलासा देणे गरजेचे आहे.यावर्षी अपुºया पावसामुळे राज्याच्या बºयाच भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारी यंत्रणा सांगत असली तरी शेतकºयांना भरभरून उत्पन्न होईल अशी स्थिती अजिबात नाही. काही भागात तर परिस्थिती खूपच वाईट आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यात शेतकरी लगेच आत्महत्येचा मार्ग पत्करत नाही. म्हणून या शोषिक शेतकºयांचे शोषण होताना उघड्या डोळ्यांनी आपण पाहणेही योग्य नाही. शासन दरबारी सर्व लोकप्रतिनिधींनी जोर लावून या जिल्ह्यातल्या शेतकºयांनाही थोडाफार का होईना, शासकीय मदतीचा दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहीजे.दिवाळी साजरी करण्यासाठी कर्मचारी वर्गाला पगार, बोनस मिळतो. नेतेमंडळींची दहाही बोटं कायम तुपात असतात. मरण होते ते केवळ शेतकºयांचेच. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याही घराला लक्ष्मीची पावलं लागावी, शेतकºयांच्या नशिबी खूप भरभराट नसली तरी किमान गरजा भागवण्यासाठी कष्टाचा पैसा वेळीच त्यांच्या हाती पडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDiwaliदिवाळी