शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

वृक्षपे्रमींच्या मदतीकडे वन विभागाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:10 IST

वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ हेक्टरमध्ये वाढविले जंगल; भर्रीटोलावासीयांच्या पाच वर्षातील कार्याची दखलच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे. शासन वनसंरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती करीत आहे. असे असले तरी भर्रीटोला येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच वर्षांपूर्वी लगतच्या जंगलातील १५ हेक्टर जागेवर विविध प्रजातींच्या रोपांची लागवड श्रमदानातून केली. या रोपांचे संगोपन केले. सध्या ही या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. या कार्यातून भर्रीटोलावासीय जणू पर्यावरण दूतच बनले. मात्र त्यांच्या या श्रमयुक्त उपक्रमाची दख वनविभागाकडून घेण्यात आली नाही.कोरची तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या भर्रीटोला परिसरात २०१४ पूर्वी या गावातील लोकांना जंगलातील सरपण, जलाऊ लाकूड, इमारती लाकूड, बांबू मिळेनासा झाला होता. गावकऱ्यांनी सभा घेऊन या अडचणीवर मात करण्यासाठी शेजारील रिकाम्या शासकीय जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक बियांची जुळवाजुळव, रोपे तयार करणे आदी कामे करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागला. २०१४ मध्ये गावकºयांनी गावालगतच्या १५ हेक्टर शासकीय जागेत विविध प्रकारची रोपे लावली. ही सर्व कामे कुणाकडूनही मोबदला न घेता श्रमदानातून करण्यात आली.गावकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तर ते अधिक जोमाने काम करू शकतात, अशी भावना त्यांच्यात आहे. या अनोख्या कार्यात ग्रामसभेचे अध्यक्ष गोविंद होळी, कुमारसाय हलामी, सुकराम होळी, लक्ष्मण मडावी, सुरेश मुंगणकर,चंदरसाय हलामी, दशरथ मडावी, दीपक मडावी यांच्यासह सोगीबाई होळी, रैनाबाई होळी, मानबाई मडावी, सुंदराबाई होळी आदी महिलासुद्धा सहभागी आहेत.लोकवर्गणीतून केला खर्चजंगलात बांबू, आंबा, चिंच,जामून, करंजी, सीताफळ, गुलमोहर आदी रोपे लावली. लावलेली रोपे जनावरे खावू नयेत म्हणून संपूर्ण १५ हेक्टर सभोवताल काटेरी तारेचे कुंपन केले. उन्हाळ्यात रोपे मरू नयेत म्हणून पाणी देण्याची व्यवस्था केली. यावरील सर्व खर्च लोकवर्गणीतून केला. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात या परिसराला वणवे लागू दिले नाही. परिसरात नकळत वणवा लागल्यास तो विझविण्यासाठी गावकरी रात्री-बेरात्री धावून जात असत. आतासुद्धा हे कार्य सुरू आहे. याठिकाणी लावलेली रोपे १५ ते २० फुट उंच झाली आहेत. सुंदर असे जंगल तयार झाले आहे.जंगलात रमतात वन्यजीवभर्रीटोला जंगलाला लागूनच लहान ओढा आहे. येथील खड्ड्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे जंगलात ससा, हरिण, काळवीट, नीलगाय, बिबट, तडस यासह विविध प्रजातींची जनावरे व पक्षी आहेत. भीमपूर या गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावकºयांनी मागणी करूनही वनतलाव मिळाले नाही. पाणी अडविण्यासाठी योजनांचा लाभ मिळाला नाही. गावकºयांच्या या अतुलनीय श्रमाची अवहेलनाच होत आहे.

टॅग्स :forestजंगल