शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

वृक्षपे्रमींच्या मदतीकडे वन विभागाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:10 IST

वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ हेक्टरमध्ये वाढविले जंगल; भर्रीटोलावासीयांच्या पाच वर्षातील कार्याची दखलच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे. शासन वनसंरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती करीत आहे. असे असले तरी भर्रीटोला येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच वर्षांपूर्वी लगतच्या जंगलातील १५ हेक्टर जागेवर विविध प्रजातींच्या रोपांची लागवड श्रमदानातून केली. या रोपांचे संगोपन केले. सध्या ही या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. या कार्यातून भर्रीटोलावासीय जणू पर्यावरण दूतच बनले. मात्र त्यांच्या या श्रमयुक्त उपक्रमाची दख वनविभागाकडून घेण्यात आली नाही.कोरची तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या भर्रीटोला परिसरात २०१४ पूर्वी या गावातील लोकांना जंगलातील सरपण, जलाऊ लाकूड, इमारती लाकूड, बांबू मिळेनासा झाला होता. गावकऱ्यांनी सभा घेऊन या अडचणीवर मात करण्यासाठी शेजारील रिकाम्या शासकीय जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक बियांची जुळवाजुळव, रोपे तयार करणे आदी कामे करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागला. २०१४ मध्ये गावकºयांनी गावालगतच्या १५ हेक्टर शासकीय जागेत विविध प्रकारची रोपे लावली. ही सर्व कामे कुणाकडूनही मोबदला न घेता श्रमदानातून करण्यात आली.गावकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तर ते अधिक जोमाने काम करू शकतात, अशी भावना त्यांच्यात आहे. या अनोख्या कार्यात ग्रामसभेचे अध्यक्ष गोविंद होळी, कुमारसाय हलामी, सुकराम होळी, लक्ष्मण मडावी, सुरेश मुंगणकर,चंदरसाय हलामी, दशरथ मडावी, दीपक मडावी यांच्यासह सोगीबाई होळी, रैनाबाई होळी, मानबाई मडावी, सुंदराबाई होळी आदी महिलासुद्धा सहभागी आहेत.लोकवर्गणीतून केला खर्चजंगलात बांबू, आंबा, चिंच,जामून, करंजी, सीताफळ, गुलमोहर आदी रोपे लावली. लावलेली रोपे जनावरे खावू नयेत म्हणून संपूर्ण १५ हेक्टर सभोवताल काटेरी तारेचे कुंपन केले. उन्हाळ्यात रोपे मरू नयेत म्हणून पाणी देण्याची व्यवस्था केली. यावरील सर्व खर्च लोकवर्गणीतून केला. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात या परिसराला वणवे लागू दिले नाही. परिसरात नकळत वणवा लागल्यास तो विझविण्यासाठी गावकरी रात्री-बेरात्री धावून जात असत. आतासुद्धा हे कार्य सुरू आहे. याठिकाणी लावलेली रोपे १५ ते २० फुट उंच झाली आहेत. सुंदर असे जंगल तयार झाले आहे.जंगलात रमतात वन्यजीवभर्रीटोला जंगलाला लागूनच लहान ओढा आहे. येथील खड्ड्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे जंगलात ससा, हरिण, काळवीट, नीलगाय, बिबट, तडस यासह विविध प्रजातींची जनावरे व पक्षी आहेत. भीमपूर या गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावकºयांनी मागणी करूनही वनतलाव मिळाले नाही. पाणी अडविण्यासाठी योजनांचा लाभ मिळाला नाही. गावकºयांच्या या अतुलनीय श्रमाची अवहेलनाच होत आहे.

टॅग्स :forestजंगल