शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षपे्रमींच्या मदतीकडे वन विभागाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:10 IST

वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १५ हेक्टरमध्ये वाढविले जंगल; भर्रीटोलावासीयांच्या पाच वर्षातील कार्याची दखलच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : वनाच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त वनविभागाचीच असते. कारण ते त्यासाठी पगार घेतात, असा गैरसमज समाजात पसरला आहे. त्याचाच परिणाम असा की,आज जंगल झपाट्याने कमी होत आहे. उष्णता वाढ, अत्यल्प पाऊस यासह विविध दाखले निसर्ग दाखवित आहे. शासन वनसंरक्षणाबाबत लोकांमध्ये जागृती करीत आहे. असे असले तरी भर्रीटोला येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाच वर्षांपूर्वी लगतच्या जंगलातील १५ हेक्टर जागेवर विविध प्रजातींच्या रोपांची लागवड श्रमदानातून केली. या रोपांचे संगोपन केले. सध्या ही या रोपांचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. या कार्यातून भर्रीटोलावासीय जणू पर्यावरण दूतच बनले. मात्र त्यांच्या या श्रमयुक्त उपक्रमाची दख वनविभागाकडून घेण्यात आली नाही.कोरची तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या भर्रीटोला परिसरात २०१४ पूर्वी या गावातील लोकांना जंगलातील सरपण, जलाऊ लाकूड, इमारती लाकूड, बांबू मिळेनासा झाला होता. गावकऱ्यांनी सभा घेऊन या अडचणीवर मात करण्यासाठी शेजारील रिकाम्या शासकीय जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक बियांची जुळवाजुळव, रोपे तयार करणे आदी कामे करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागला. २०१४ मध्ये गावकºयांनी गावालगतच्या १५ हेक्टर शासकीय जागेत विविध प्रकारची रोपे लावली. ही सर्व कामे कुणाकडूनही मोबदला न घेता श्रमदानातून करण्यात आली.गावकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली तर ते अधिक जोमाने काम करू शकतात, अशी भावना त्यांच्यात आहे. या अनोख्या कार्यात ग्रामसभेचे अध्यक्ष गोविंद होळी, कुमारसाय हलामी, सुकराम होळी, लक्ष्मण मडावी, सुरेश मुंगणकर,चंदरसाय हलामी, दशरथ मडावी, दीपक मडावी यांच्यासह सोगीबाई होळी, रैनाबाई होळी, मानबाई मडावी, सुंदराबाई होळी आदी महिलासुद्धा सहभागी आहेत.लोकवर्गणीतून केला खर्चजंगलात बांबू, आंबा, चिंच,जामून, करंजी, सीताफळ, गुलमोहर आदी रोपे लावली. लावलेली रोपे जनावरे खावू नयेत म्हणून संपूर्ण १५ हेक्टर सभोवताल काटेरी तारेचे कुंपन केले. उन्हाळ्यात रोपे मरू नयेत म्हणून पाणी देण्याची व्यवस्था केली. यावरील सर्व खर्च लोकवर्गणीतून केला. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात या परिसराला वणवे लागू दिले नाही. परिसरात नकळत वणवा लागल्यास तो विझविण्यासाठी गावकरी रात्री-बेरात्री धावून जात असत. आतासुद्धा हे कार्य सुरू आहे. याठिकाणी लावलेली रोपे १५ ते २० फुट उंच झाली आहेत. सुंदर असे जंगल तयार झाले आहे.जंगलात रमतात वन्यजीवभर्रीटोला जंगलाला लागूनच लहान ओढा आहे. येथील खड्ड्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे जंगलात ससा, हरिण, काळवीट, नीलगाय, बिबट, तडस यासह विविध प्रजातींची जनावरे व पक्षी आहेत. भीमपूर या गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावकºयांनी मागणी करूनही वनतलाव मिळाले नाही. पाणी अडविण्यासाठी योजनांचा लाभ मिळाला नाही. गावकºयांच्या या अतुलनीय श्रमाची अवहेलनाच होत आहे.

टॅग्स :forestजंगल