शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

भ्रष्टाचाराचा उजेड गाजणार विधिमंडळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:41 IST

जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनासाठी एलएक्यू लावला आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील विद्युतीकरण घोटाळा : चौकशी समितीच्या ठपक्यानंतरही कारवाई नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनासाठी एलएक्यू लावला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.देसाईगंज शहरातील तीन वर्षांपूर्वीच्या या विद्युतीकरण कामासाठी १ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चाला मुख्य अभियंता (तांत्रिक), सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र खांबांच्या उभारणीपासून तर दिवे लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी घोळ झाल्याचे समोर आले आहे.देसाईगंज नगर परिषदेने सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ८ आॅगस्ट २०१३ रोजी प्रभाग क्रमांक १ ते ४ मध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक एलईडी लाईट फिटींगसह विद्युत खांब उभारणीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. जिल्हा नियोजन समितीत ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.या कामातील आर्थिक/वित्तीय बाबींची तपासणी करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयातील उपप्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी ६ डिसेंबर २०१७ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यात काम न करताच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करणे, तांत्रिक मंजुरीनुसार फिलीप्स कंपनीचे दिवे लावायचे असताना त्याऐवजी दुसऱ्याच कंपनीचे दिवे खरेदी करणे, तांत्रिक तपासणी न करताच ८० टक्के अग्रीम देणे, सा.बां. विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करणे आदी बाबी समोर आल्या होत्या.तांत्रिक मान्यतेनुसार एकूण ४ कामे मिळून प्रत्येकी ३० प्रमाणे १२० विद्युत खांबांसाठीच मंजुरी प्रदान केली असताना अतिरिक्त ३० खांब लावण्यात आले. तांत्रिक मान्यतेनुसार विद्युत खांबाची किंमत ३० हजार ६७५ एवढी होती. त्यामुळे अतिरिक्त ३० खांबांपोटी ९ लाख २० हजार २७१ रुपयांचा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. मूळ कामात फेरबदल करायचा असल्यास महाराष्ट्र लेखासंहिता अधिनियम २०११ चे नियम १३१ अनुसार त्याकरिता पुनश्च सुधारित तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र सक्षम अधिकाºयांची तांत्रिक मान्यता न घेताच ठराव पारित करण्यात आला.या प्रकरणात अनेकांच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांंनी चौकशी समिती नेमली. त्या समितीचा अहवालही येऊन आता ९ महिने उलटून गेले. तरीही कोणतीही कारवाई न करण्यामागील कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.कर्मचाऱ्यांकडून मागितले स्पष्टीकरणयासंदर्भात जिल्ह्याचे नगर पालिका प्रशासन अधिकारी सोमनाथ शेटे यांना विचारले असता या प्रकरणाशी संबंधित कर्मचाºयांना १० दिवसांत स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फिलीप्सऐवजी बजाज कंपनीचे बल्ब लावल्याप्रकरणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडेही स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे खुलासे आल्यानंतर विभागीय चौकशी अधिकाºयाची नेमणूक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास नाहीचया प्रकरणात कंत्राटदार-पुरवठादार सोम इलेक्ट्रीकल्स यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी विनोद जाधव हेसुद्धा दोषी असल्याचा ठपका विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. याशिवाय नगर परिषदेतील इतर अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचे चौकशी समितीचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्याच्या एका राजकीय नेत्याच्या दबावात ही सर्व कारवाई थांबविण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग