शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भ्रष्टाचाराचा उजेड गाजणार विधिमंडळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:41 IST

जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनासाठी एलएक्यू लावला आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील विद्युतीकरण घोटाळा : चौकशी समितीच्या ठपक्यानंतरही कारवाई नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनासाठी एलएक्यू लावला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.देसाईगंज शहरातील तीन वर्षांपूर्वीच्या या विद्युतीकरण कामासाठी १ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चाला मुख्य अभियंता (तांत्रिक), सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र खांबांच्या उभारणीपासून तर दिवे लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी घोळ झाल्याचे समोर आले आहे.देसाईगंज नगर परिषदेने सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ८ आॅगस्ट २०१३ रोजी प्रभाग क्रमांक १ ते ४ मध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक एलईडी लाईट फिटींगसह विद्युत खांब उभारणीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. जिल्हा नियोजन समितीत ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.या कामातील आर्थिक/वित्तीय बाबींची तपासणी करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयातील उपप्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी ६ डिसेंबर २०१७ रोजी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यात काम न करताच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करणे, तांत्रिक मंजुरीनुसार फिलीप्स कंपनीचे दिवे लावायचे असताना त्याऐवजी दुसऱ्याच कंपनीचे दिवे खरेदी करणे, तांत्रिक तपासणी न करताच ८० टक्के अग्रीम देणे, सा.बां. विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करणे आदी बाबी समोर आल्या होत्या.तांत्रिक मान्यतेनुसार एकूण ४ कामे मिळून प्रत्येकी ३० प्रमाणे १२० विद्युत खांबांसाठीच मंजुरी प्रदान केली असताना अतिरिक्त ३० खांब लावण्यात आले. तांत्रिक मान्यतेनुसार विद्युत खांबाची किंमत ३० हजार ६७५ एवढी होती. त्यामुळे अतिरिक्त ३० खांबांपोटी ९ लाख २० हजार २७१ रुपयांचा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. मूळ कामात फेरबदल करायचा असल्यास महाराष्ट्र लेखासंहिता अधिनियम २०११ चे नियम १३१ अनुसार त्याकरिता पुनश्च सुधारित तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र सक्षम अधिकाºयांची तांत्रिक मान्यता न घेताच ठराव पारित करण्यात आला.या प्रकरणात अनेकांच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांंनी चौकशी समिती नेमली. त्या समितीचा अहवालही येऊन आता ९ महिने उलटून गेले. तरीही कोणतीही कारवाई न करण्यामागील कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.कर्मचाऱ्यांकडून मागितले स्पष्टीकरणयासंदर्भात जिल्ह्याचे नगर पालिका प्रशासन अधिकारी सोमनाथ शेटे यांना विचारले असता या प्रकरणाशी संबंधित कर्मचाºयांना १० दिवसांत स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फिलीप्सऐवजी बजाज कंपनीचे बल्ब लावल्याप्रकरणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडेही स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे खुलासे आल्यानंतर विभागीय चौकशी अधिकाºयाची नेमणूक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास नाहीचया प्रकरणात कंत्राटदार-पुरवठादार सोम इलेक्ट्रीकल्स यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी विनोद जाधव हेसुद्धा दोषी असल्याचा ठपका विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. याशिवाय नगर परिषदेतील इतर अधिकारी व कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय सदर प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणे आवश्यक असल्याचे चौकशी समितीचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्याच्या एका राजकीय नेत्याच्या दबावात ही सर्व कारवाई थांबविण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारpwdसार्वजनिक बांधकाम विभाग