शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
3
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
4
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
5
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
6
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
7
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
8
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
9
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
10
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
11
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
12
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
13
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
14
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
15
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
16
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
17
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
18
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
19
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
20
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

पानाच्या पत्रावळी व द्रोण लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST

धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न, मोठे समारंभ असले की त्या मोहल्ल्यातील नागरिक कोणताही मोबदला न घेता ...

धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न, मोठे समारंभ असले की त्या मोहल्ल्यातील नागरिक कोणताही मोबदला न घेता जंगलात जाऊन पळस, कुडा, मोह झाडांची पाने तोडून आणून सायंकाळी चौकात १० ते २० नागरिक एकत्र बसून गंमतीजमतीत पत्रावळी तयार करून घेत असत त्यामुळे ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे अशांना मोठा दिलासा मिळत असे मात्र दिवसेंदिवस हा सेवाभाव समाजातून कमी होत चालला आहे. पत्रावळी व द्रोण तयार करणारे कुटुंब लग्न समारंभ काळात या कामातून चार पैसे कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते मात्र या कुटुंबावर आता उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. एक प्रकारचा घरगुती लघुउद्योग असायचा. घरातील सर्व मंडळी पानाच्या पत्रावळी तयार करण्यास मदत करीत होते. मात्र आता सर्रास प्लास्टिक, स्टील, थर्माकोल ताटांनी त्याची जागा घेतली आहे. त्यामुळे पानाच्या पत्रावळी दिसेनाशा झाल्या आहेत.

(बॉक्स)

प्लास्टिकबंदी ठरतेय कुचकामी

सन २०१८ पासून शासनाने यावर बंदी घातल्यावरही पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पानांच्या पत्रावळींना चांगले दिवस येतील असे वाटू लागले होते, मात्र शासनाच्या कागदोपत्री बंदीचा यावर कोणताही परिणाम झाला नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा व ज्याचे आयुर्वेद साक्ष देते त्या पानाच्या पत्रावळी तयार करण्यासाठी लिंबाच्या किंवा बांबूच्या काड्याचा शिळक म्हणून वापर केला जात असे. अजूनही ग्रामीण भागात घरगुती कार्यक्रमात पानांच्या पत्रावळीत देवाला नैवेद्य मांडला जातो. पानांच्या पत्रावळीमुळे भोजनावळीची रांग शोभून दिसत होती.

===Photopath===

160521\28371651img-20210516-wa0160.jpg

===Caption===

पानाच पत्रावळी व द्रोण