शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कोतवालांचे तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:53 IST

कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ वेतनश्रेणीचा लाभ देऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोतवालांनी धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे पाठविले.

ठळक मुद्देवेतनश्रेणी लागू करण्याची मागणी : १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ वेतनश्रेणीचा लाभ देऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोतवालांनी धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे पाठविले.निवेदनात म्हटले आहे की, कोतवाल हा इंग्रज काळापासून महसूलची कामे करीत आहे. महसूल विभागातील कोतवाल हा सर्वात शेवटचा घटक असला तरी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असली तरी शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.वेतनश्रेणी लागू करून सहाव्या वेतन आयोगानुसार कोतवालांना १४ हजार ९६९ रूपये वेतन द्यावे. याबाबतचा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करावा, या मागणीसाठी राज्यभरातील कोतवाल, कर्मचारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १९ नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कोतवालांनीही सहभाग घेतला आहे.एटापल्ली तालुक्यातीलही कोतवालांनी कामबंद आंदोलन करून तहसील कार्यालयासमोर धरणे दिली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. निवेदनावर देवानंद भांडेकर, प्रकाश पुंगाटी, संतोष मडावी, विलास चांदेकर, प्रदीप गुंडेवार, कालिदास गेडाम, सागर गेडाम, गुरूदास जेंगठे, बी.ए.दुर्गे, अंताराम पुंगाटी, रानू कड्यामी, गणेश दुर्गे, कपील सिडाम, विनोद खोब्रागडे, सचिन गेडाम, गोसाई बारसागडे, नीलेश चांदेकर, कुंदन दुर्गे, उज्ज्वला सरकार, अनिल कुंभार, उमेश अलोणे, राकेश रामपल्लीवार, सुरेश दुर्गे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.कोतवाल हे महसूल विभागातील कनिष्ठ दर्जाचे पद असले तरी महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाची कामे कोतवालाच्या मार्फत केली जातात. त्यामुळे कोतवालांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.