शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांचे तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:53 IST

कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ वेतनश्रेणीचा लाभ देऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोतवालांनी धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे पाठविले.

ठळक मुद्देवेतनश्रेणी लागू करण्याची मागणी : १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ वेतनश्रेणीचा लाभ देऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कोतवालांनी १९ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एटापल्ली तालुक्यातील कोतवालांनी धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत शासनाकडे पाठविले.निवेदनात म्हटले आहे की, कोतवाल हा इंग्रज काळापासून महसूलची कामे करीत आहे. महसूल विभागातील कोतवाल हा सर्वात शेवटचा घटक असला तरी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असली तरी शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.वेतनश्रेणी लागू करून सहाव्या वेतन आयोगानुसार कोतवालांना १४ हजार ९६९ रूपये वेतन द्यावे. याबाबतचा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करावा, या मागणीसाठी राज्यभरातील कोतवाल, कर्मचारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १९ नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कोतवालांनीही सहभाग घेतला आहे.एटापल्ली तालुक्यातीलही कोतवालांनी कामबंद आंदोलन करून तहसील कार्यालयासमोर धरणे दिली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. निवेदनावर देवानंद भांडेकर, प्रकाश पुंगाटी, संतोष मडावी, विलास चांदेकर, प्रदीप गुंडेवार, कालिदास गेडाम, सागर गेडाम, गुरूदास जेंगठे, बी.ए.दुर्गे, अंताराम पुंगाटी, रानू कड्यामी, गणेश दुर्गे, कपील सिडाम, विनोद खोब्रागडे, सचिन गेडाम, गोसाई बारसागडे, नीलेश चांदेकर, कुंदन दुर्गे, उज्ज्वला सरकार, अनिल कुंभार, उमेश अलोणे, राकेश रामपल्लीवार, सुरेश दुर्गे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.कोतवाल हे महसूल विभागातील कनिष्ठ दर्जाचे पद असले तरी महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाची कामे कोतवालाच्या मार्फत केली जातात. त्यामुळे कोतवालांना वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.