शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत वकिलांचे कामबंद सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने विधी व न्याय मंत्रालयात पाठविला होता. विधी व न्याय मंत्रालयाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र अजूनपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयाचा दर्जा दिला नाही. त्यामुळे वादी व प्रतिवादींना गडचिरोली येथे जावे लागत आहे. सामान्य वादी, प्रतिवादींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसिरोंचातही आंदोलन : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून अहेरी व सिरोंचा येथील वकिलांनी (अधिवक्ता) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. विशेष म्हणजे मंगळवारी सिरोंचा येथे वकिलांच्या समर्थनार्थ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडला.गडचिरोली जिल्हा लांबीने अतिशय मोठा आहे. सिरोंचा येथील एखाद्या नागरिकाचा गडचिरोलीतील जिल्हा न्यायालयात खटला सुरू असेल तर तारखेच्या वेळी एक दिवसाच्या मुक्कामानेच गडचिरोली येथे यावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. त्यादृष्टीने अहेरीत विस्तीर्ण इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण ३ एप्रिल २०१५ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले होते.अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने विधी व न्याय मंत्रालयात पाठविला होता. विधी व न्याय मंत्रालयाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र अजूनपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयाचा दर्जा दिला नाही. त्यामुळे वादी व प्रतिवादींना गडचिरोली येथे जावे लागत आहे. सामान्य वादी, प्रतिवादींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी लक्षात घेतल्यानंतर काही नागरिक न्यायालयात प्रकरणे दाखल करीत नाहीत. परिणामी नागरिकांना न्यायापासून वंचित राहावे लागते.ही अडचण लक्षात घेऊन अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व्हावे, या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.वकिलांच्या आंदोलनाला सामान्य नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे. वकिलांनी कामबंद केल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प पडले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे.आमची मागणी जनतेच्या हिताची असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील रणनिती ठरविली जाणार आहे. भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होईल.- अ‍ॅड.संघरत्न कुंभारे, तालुकाध्यक्ष,अधिवक्ता संघटना, अहेरी

टॅग्स :Courtन्यायालय