शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी शब्द पाळला : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अहेरी उपविभागात १०० कोटींची कामे

ऑनलाईन लोकमत सिरोंचा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. ना. आत्राम यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला.मोेयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडल्यानंतर बोरमपल्ली येथे सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, गतवर्षी शासनाकडून १८० कोटी रूपयांचा निधी आणण्यात आपल्याला यश मिळाले. पुढील वर्षी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या २० किमीच्या रस्त्यासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. आसरअल्ली-कोपेला या १२ किमीच्या रस्ता कामासाठी १२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामांचा समावेश असून रस्ता निर्मितीमुळे दुर्गम भागातील गावे बारमाही रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. परिणामी वाहनांची वाहतूक वाढणार आहे.सभेला प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचाचे नगरसेवक संदीप राचेर्लावार, नाविसंचे उपाध्यक्ष संतोष पडालवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, श्रीनाथ राऊत, दिलीप सनीगारापू, रवी चकीनारापू, संतोष पटला, पाणीपुरवठा सभापती विजय तोकला, पं. स. सदस्य जयमना दुर्गम, स्वामी मासर्ला, बाबर शेख, रामन्ना कडार्ला, सुरेश पद्मगिरीवार, जयेंद्र श्रीपती, नीलेश गग्गुरी, अशोक पेद्दी, राजेशम कासेट्टी, मलान्ना संगर्ती, राजबापू पोलमपल्ली आादी उपस्थित होते.तथाकथित राजकारणाला बळी पडू नका-आत्रामकाही लोक गैरसमज पसरवित असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी तथाकथित राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही जी कामे झाली नाहीत, ती कामे आपण सिरोंचा तालुक्यात पूर्ण करणार, असे ते म्हणाले.