शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी शब्द पाळला : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अहेरी उपविभागात १०० कोटींची कामे

ऑनलाईन लोकमत सिरोंचा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. ना. आत्राम यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला.मोेयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडल्यानंतर बोरमपल्ली येथे सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, गतवर्षी शासनाकडून १८० कोटी रूपयांचा निधी आणण्यात आपल्याला यश मिळाले. पुढील वर्षी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या २० किमीच्या रस्त्यासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. आसरअल्ली-कोपेला या १२ किमीच्या रस्ता कामासाठी १२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामांचा समावेश असून रस्ता निर्मितीमुळे दुर्गम भागातील गावे बारमाही रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. परिणामी वाहनांची वाहतूक वाढणार आहे.सभेला प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचाचे नगरसेवक संदीप राचेर्लावार, नाविसंचे उपाध्यक्ष संतोष पडालवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, श्रीनाथ राऊत, दिलीप सनीगारापू, रवी चकीनारापू, संतोष पटला, पाणीपुरवठा सभापती विजय तोकला, पं. स. सदस्य जयमना दुर्गम, स्वामी मासर्ला, बाबर शेख, रामन्ना कडार्ला, सुरेश पद्मगिरीवार, जयेंद्र श्रीपती, नीलेश गग्गुरी, अशोक पेद्दी, राजेशम कासेट्टी, मलान्ना संगर्ती, राजबापू पोलमपल्ली आादी उपस्थित होते.तथाकथित राजकारणाला बळी पडू नका-आत्रामकाही लोक गैरसमज पसरवित असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी तथाकथित राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही जी कामे झाली नाहीत, ती कामे आपण सिरोंचा तालुक्यात पूर्ण करणार, असे ते म्हणाले.