शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आदिवासी मतदारांचेही मोठ्या प्रमाणावर विभाजन

By admin | Updated: October 11, 2014 01:41 IST

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून आदिवासी प्रवर्गाचेच उमेदवार रिंगणात असतात. मात्र या प्रवर्गात विविध जमाती आदिवासी समुदायातही आहे.

गडचिरोली : अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून आदिवासी प्रवर्गाचेच उमेदवार रिंगणात असतात. मात्र या प्रवर्गात विविध जमाती आदिवासी समुदायातही आहे. त्यामुळे या जमातीनिहाय मतदानावर आदिवासी उमेदवारांचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे. आदिवासी समाजात माडिया, राजगोंड, गोंड, परधान, गायतागोंड आदी समुदाय वास्तव्याला आहेत. यांच्या समुदायात शिक्षणाचे प्रमाणही आता झपाट्याने वाढले आहे. आदिवासी प्रवर्गातून अनेक तरूण डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून उच्च शिक्षण घेऊन पुढे आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी सर्वसमावेशक काम करीत आहे. तसेच राज्यशासनाच्या अनेक उच्च पदावरील नोकऱ्यांवरही या समाजातून मंडळी कार्यरत असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उच्चविद्याविभुषीत उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे आदिवासी समुदायातील मतदानाचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. मतदार संघात रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये आपल्या प्रवर्गाचा कोण याचा कानोसा आदिवासी मतदार घेताना दिसून येत आहे. माडिया जमातीचे आदिवासी मतदार आपल्या समाजाच्या मतदाराकडे वळण्यापूर्वी त्याच्या कर्तृत्वाचाही आढावा घेत असताना तरूण मतदार दिसत आहे. परधान समाजाचीही हीच परिस्थिती आहे. आपल्या समाजाचे चार-पाच उमेदवार रिंगणात असल्याने यातील कोणता उमेदवार योग्य याचीही शहानिशा ते करून घेताना दिसत आहे. तसेच आदिवासी समाजातील अनेक मुख्य लोक आहे ते सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या समाजजीवनात वावरत आलेले आहे. त्यांचा वावर समाजाच्या कक्षा सोडूनही इतर समाजातही राहिलेला आहे. त्यामुळे ते या निवडणुकांमध्ये मुख्य भूमिका बजावित आहेत. आदिवासी मतदार मतदान करताना आजवर या उमेदवारांनी लढविलेल्या निवडणुकांचाही आढावा घेताना दिसत आहे. यातील अनेक उमेदवार कधी या पक्षाकडून तर कधी त्या पक्षाकडून रिंगणात उतरले. जिल्हा परिषद निवडणुकाही काहींनी लढविलेल्या. या साऱ्या बाबी आदिवासी मतदार जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आदिवासी मतांचे गठ्ठा मतदान कुण्या एका उमेदवाराकडे जाणार नाही. ते विभाजीत होईल, असे सारासार चित्र आहे. त्यामुळे गैर आदिवासी मतदार व बंगाली बहूल पट्ट्यात आघाडी घेतलेलाच उमेदवार या निवडणुकीत रिंगणात बाजी मारेल, असे राजकीय जाणकार मानतात. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सीमारेषा ओलांडून आदिवासी प्रवर्गातील गरीब व मागास प्रवर्गाच्याही उमेदवाराच्या बाजुने पारडे झुकू शकते, असा अंदाज आहे.