शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

८३ गावांतील जमिनीची चाचणी

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील

शेतकऱ्यांना मार्गदर्शक : मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाचा उपक्रमगडचिरोली : राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील ८३ गावांमधील जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीमधील नमुने घेऊन त्यांची चाचणी केली आहे. चाचणी झालेल्या जमिनीच्या मालकांना आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. जमिनीचा प्रकार व पीक यांचा थेट संबंध आहे. पिकाला योग्य असलेल्या जमिनीत लागवड झाल्यास त्या ठिकाणी कमी खर्चात शेतीतून चांगले उत्पादन मिळत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातील जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्य आहेत. हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे आरोग्य कळावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय शास्वत शेती हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत देशभरातील संपूर्ण जमिनीची तपासणी केली करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १३ हजार ६५९ नमुने घेण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत ८३ गावांमधील १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चाचणी झालेल्या नोंदणीकृत ३ हजार १३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण केले जाणार आहे. काही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या शेतांतर्गत येणाऱ्या भागामध्ये मृद चाचणी झाली असल्यास संबंधित शेतकऱ्याने मागणी केल्यास त्यालाही आरोग्य पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा मृद चाचणी सर्वेक्षण विभागाकडे २ हजार ५९७ नमुने दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ७७१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यातील १२०, धानोरा २१६, देसाईगंज १ हजार ६१, आरमोरी २३८, कोरची ९६, कुरखेडा तालुक्यातील ४० नमुने तपासण्यात आले आहेत. मृद चाचणीमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य कळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ते जमिनीच्या पोतानुसार पिकाची लागवड करू शकणार आहेत. (नगर प्रतिनिधी)चाचणी झालेल्या गावांची नावेमृद चाचणी झालेल्या गावांमध्ये कोटगल, मुडझा, पारडी, नवेगाव, धानोरा तालुक्यातील मिचगाव, केसनिल, बोरी, येरसगोंदी, पदाबोरीया, हिपानेर, बोदीन, पाथरगोटा, रोठारिल, गुरानटोला, रूपीनगट्टा, तुळमेघ, कोंडेवाडा, हंटाझूर, निमगाव, मासरी घाटा, निमनवाडा, रांगी, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, विहिरगाव, पोटगाव, विठ्ठलगाव, पिंपळगाव, किन्हाळा, डोंगरगाव, अरततोंडी, फरी, चिखली, उसेगाव, विसोरा, एकलपूर, आमगाव, बोडधा, बोडधा तुकूम, सावंगी, गांधीनगर, कुरूड, शंकरपूर कसारी, कळमगाव, शेलदा, डोंगरमेंढा, कोरेगाव व चोप, आरमोरी तालुक्यातील नागरवाही, मानापूर, कोसरी, देलनवाडी, मांगदा, नवरगाव मक्ता, मंजेवाडा, खैरी रिठ, देवीपूर, बोडधा चक, चिचोली, हिरापूर रिठ, मोहझरी, मुल्लूर चक, रवी, सुकाळा, मेंढेबोडी, कोरची तालुक्यातील बोटेझरी, नारकसा, न्याहालड, टेकामेटा, पुलरगोंदी, कहाकाबोडी, भिमनकोजी, रानगट्टा, तलवारगड, कुरखेडा तालुक्यातील ठुसी, येडसकुही रिठ, कमलपाल, चरवीदंड, गांगसाय टोला, जांभळी या गावांचा समावेश आहे.मृदा चाचणीची गती संथदर तीन वर्षाने जमिनीतील नत्र, स्पुरद, पालाश, सामू यांच्या प्रमाणात बदल होत असल्याने दर तीन वर्षांनी मृदा तपासणी होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेत जमिनीचे ४० हजार ९७७ नमुने निघतात. त्यानुसार दरवर्षी जवळपास १३ हजार नमुन्यांची तपासणी होणे गरजेचे असल्याने तेवढेच लक्षांक ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी केवळ २ हजार ५९७ नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातही केवळ १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील पाच महिने शिल्लक असले तरी नमुने तपासणीची गती लक्षात घेतली तर मार्च अखेरपर्यंतही लक्षांकापर्यंत कठीण होणार आहे.नाममात्र दरात होते नमुना चाचणीशाश्वत शेती अंतर्गत कृषी सहायक स्वत:च मातीचे नमुने घेऊन येतात. या नमुन्यांची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते. मात्र एखाद्या शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीची वैयक्तिक चाचणी करतो म्हटल्यास त्यालाही अत्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते. सर्वसाधारण नमुन्यासाठी ३५ रूपये व सुक्ष्म नमुन्यासाठी २३५ रूपये शुल्क आकारल्या जाते.