शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विद्यापीठासाठीच्या जमिनीचे भाव घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता.

ठळक मुद्देजमीन देण्यास नकार : मूळ दर नऊ लाखांवरून सहा लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यापीठासाठी अधिग्रहीत करायच्या जमिनीचे भाव घटविल्याने शेतकरी नाराज झाले असून विद्यापीठास जमीन देण्यास स्पष्टपणे शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करणे महसूल प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे.गोंडवाना विद्यापीठासाठी आरमोरी मार्गावरील कठाणी नदी नजीकची ७९ हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करायची आहे. अगदी सुरूवातीला विद्यापीठाने रेडीरेकनर दरा प्रमाणे शासनाकडे ८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला. शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता. मात्र काही सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पुन्हा जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये मूळ दर ६ लाख ९ हजार रुपये एवढा ठरविण्यात आला आहे. नवीन दराप्रमाणे शेतकऱ्यांना जवळपास २० लाख रुपये एकर एवढीच किमत मिळणार आहे.जिल्हा मूल्यांकन समितीने ठरविलेल्या नवीन दराची माहिती देण्यासाठी विद्यापीठात शुक्रवारी शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश शेतकरी उपस्थित होते. कमी झालेल्या दराबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाने शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत विद्यापीठाला जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला. भाजीपाल्याच्या दराप्रमाणे प्रत्येक वेळी जमिनीचे भाव घटविले जात आहेत. विद्यापीठाला जमीन देणे परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.महामार्गाला जमीन लागून असलेल्यांनाही अधिकचा भाव नाहीपाच ते सहा शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. शेतकºयांनी कालव्यासाठी स्वत:ची जमीन उपलब्ध करून दिली. अगदी सुरूवातीला राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याचा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मोजणी करून कालवा असल्याने जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून नाही, असा शेरा मूल्यांकन समितीने मारला. मात्र सदर जमीन शेतकऱ्यांनी शासनाला विक्रीपत्र करून दिली नसून ती केवळ शासकीय उपयोगासाठी शासनाला दिली आहे. कालव्याच्या जमिनीचा मूळ मालक शेतकरीच आहे. असे असतानाही या शेतकऱ्यांना कमी दर दिला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तर जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. खुल्या बाजारातही या जमिनीचा भाव विद्यापीठ देत असलेल्या भावापेक्षा अधिक आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ