शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठासाठीच्या जमिनीचे भाव घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता.

ठळक मुद्देजमीन देण्यास नकार : मूळ दर नऊ लाखांवरून सहा लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यापीठासाठी अधिग्रहीत करायच्या जमिनीचे भाव घटविल्याने शेतकरी नाराज झाले असून विद्यापीठास जमीन देण्यास स्पष्टपणे शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करणे महसूल प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे.गोंडवाना विद्यापीठासाठी आरमोरी मार्गावरील कठाणी नदी नजीकची ७९ हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करायची आहे. अगदी सुरूवातीला विद्यापीठाने रेडीरेकनर दरा प्रमाणे शासनाकडे ८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला. शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता. मात्र काही सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पुन्हा जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये मूळ दर ६ लाख ९ हजार रुपये एवढा ठरविण्यात आला आहे. नवीन दराप्रमाणे शेतकऱ्यांना जवळपास २० लाख रुपये एकर एवढीच किमत मिळणार आहे.जिल्हा मूल्यांकन समितीने ठरविलेल्या नवीन दराची माहिती देण्यासाठी विद्यापीठात शुक्रवारी शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश शेतकरी उपस्थित होते. कमी झालेल्या दराबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाने शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत विद्यापीठाला जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला. भाजीपाल्याच्या दराप्रमाणे प्रत्येक वेळी जमिनीचे भाव घटविले जात आहेत. विद्यापीठाला जमीन देणे परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.महामार्गाला जमीन लागून असलेल्यांनाही अधिकचा भाव नाहीपाच ते सहा शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. शेतकºयांनी कालव्यासाठी स्वत:ची जमीन उपलब्ध करून दिली. अगदी सुरूवातीला राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याचा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मोजणी करून कालवा असल्याने जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून नाही, असा शेरा मूल्यांकन समितीने मारला. मात्र सदर जमीन शेतकऱ्यांनी शासनाला विक्रीपत्र करून दिली नसून ती केवळ शासकीय उपयोगासाठी शासनाला दिली आहे. कालव्याच्या जमिनीचा मूळ मालक शेतकरीच आहे. असे असतानाही या शेतकऱ्यांना कमी दर दिला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तर जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. खुल्या बाजारातही या जमिनीचा भाव विद्यापीठ देत असलेल्या भावापेक्षा अधिक आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ