शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

गडचिराेली रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

देसाईगंज-गडचिराेली या रेल्वे मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली आहे. सर्वेचे काम आटाेपले हाेते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेला गती आली आहे. गडचिराेली उपविभागातील गडचिराेली, माेहझरी पॅच, काटली, साखरी, महादवाडी, गाेगाव, अडपल्ली, लांझेडा या गावांमधील ४५.७६ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गडचिराेली उपविभागाअंतर्गत येत असलेल्या आठ गावांमधील ४५.७६ हेक्टर आर खासगी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. लवकरच रजिस्ट्रिलाही सुरुवात हाेणार आहे. देसाईगंज-गडचिराेली या रेल्वे मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली आहे. सर्वेचे काम आटाेपले हाेते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेला गती आली आहे. गडचिराेली उपविभागातील गडचिराेली, माेहझरी पॅच, काटली, साखरी, महादवाडी, गाेगाव, अडपल्ली, लांझेडा या गावांमधील ४५.७६ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यामुळे आता गडचिराेलीत रेल्वे येईल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे दिसून येत आहे. 

२१ पासून रजिस्ट्रीअडपल्ली, काटली येथील शेतकरी जमीन देण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीची प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून चालू हाेत आहे. इतरही गावांमधील जमीन खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरुवात हाेणार आहे. 

विराेध केल्यास २५ टक्के रक्कम कपात

-    २०१३ च्या शासकीय कामासाठी जमीन अधिग्रहणाच्या कायद्यानुसार जमीन अधिग्रहणाचे दाेन प्रकार आहेत. त्यामध्ये थेट खरेदी व सक्तीचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्याने काेणताही विराेध दर्शविला नाही तर त्याला शासकीय नियमानुसार १०० टक्के माेबदला दिला जाते. मात्र त्याने जमीन अधिग्रहणास विराेध दर्शविल्यास शासन सक्तीने जमिनीची खरेदी करते. अशावेळी २५ टक्के रक्कम कपात करून पैसे दिले जातात. यामध्ये शेतकऱ्याचा ताेटा हाेते. 

शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याला शेतजमिनीचा माेबदला दिला जाते. यात काेणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जात नाही. शेतकऱ्यांनी विराेध न करता शासकीय कामासाठी जमीन दिल्यास त्यांना १०० टक्के माेबदला मिळते. मात्र विराेध केल्यास २५ टक्के रक्कम कपात हाेते. शासन मात्र काेणत्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहित करतेच. त्यामुळे शेतकऱ्यांनी विराेध न करता जमीन उपलब्ध करावी.- आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी गडचिराेली 

 

टॅग्स :railwayरेल्वे