शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मजुरांसाठी धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले.

ठळक मुद्देअडचणीच्या काळात मदत : लॉकडाऊनच्या कालावधित अडीच हजार मजुरांना पोहोचविले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने एसटीवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशाही परिस्थितीत एसटीने सामाजिक जबाबदारी पार पाडताना जिल्हाभरातील जवळपास २ हजार ५०० मजुरांना त्यांच्या गावापर्यंत एसटीने पोहोचवून दिले आहे.केंद्र शासनाने ४ मे पासून मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांना तेलंगणा राज्यातील वाहने आष्टी, सिरोंचा येथे सोडत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच खासगी वाहनांची सेवा बंद असल्याने एसटीशिवाय पर्याय नव्हता. अशा संकटकाळात एसटीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिले आहे. विशेष म्हणजे शारीरिक अंतर ठेवून प्रवाशी बसविल्याने एसटीच्या प्रवाशी क्षमतेच्या केवळ अर्धेच प्रवाशी बसविले जात होते. त्यामुळे एसटीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. तरीही एसटी बसगाड्या सोडण्यात आल्या. प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.आंध्रप्रदेश राज्यातून काही मजूर रेल्वेने देसाईगंज येथे आले. या प्रवाशांनाही त्यांच्या गावी सोडण्यात आले. काही प्रवाशी चालत गडचिरोलीपर्यंत पोहोचत होते. गडचिरोली येथील बसस्थानकात पोहोचल्यानंतर एसटीने सोडून देण्याची विनवणी करीत होते. अशाही प्रवाशांना एसटीने त्यांच्या गावार्यंत सोडून दिले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले. गावापर्यंत पोहोचलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर एसटीच्या मदतीमुळे हास्य उमलल्याचे दिसून येत होते.पायदळ मजूर आशेने गाठतात बसस्थानकचंद्रपूर व इतर जिल्ह्यातून काही मजूर अजूनही परत येत आहेत. सदर मजूर गडचिरोलीपर्यंत मालवाहू किंवा इतर साधनाने येतात. गडचिरोली येथे आल्यानंतर सर्वप्रथम बसस्थानक गाठतात. या मजुरांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी बसचालकांनी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अशा परिस्थितीत मजूर व सामान्य व्यक्तीच्या मदतीला एसटी धावून आली आहे.एसटीने आजपर्यंत अनेक चढ-उतार बघितले आहेत. एसटीने उत्पन्नापेक्षा सामाजिक जबाबदारीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत निम्मेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. एवढे प्रवाशी बसवून एसटी चालविणे कठीण आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत मजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी बसेस सोडण्यात आल्या. अडचणीच्या काळात एसटी मजुरांच्या मदतीसाठी धाऊन गेली, याचे समाधान आहे.- अशोककुमार वाडीभस्मे,विभाग नियंत्रक, गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी