शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

मजुरांसाठी धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले.

ठळक मुद्देअडचणीच्या काळात मदत : लॉकडाऊनच्या कालावधित अडीच हजार मजुरांना पोहोचविले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने एसटीवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशाही परिस्थितीत एसटीने सामाजिक जबाबदारी पार पाडताना जिल्हाभरातील जवळपास २ हजार ५०० मजुरांना त्यांच्या गावापर्यंत एसटीने पोहोचवून दिले आहे.केंद्र शासनाने ४ मे पासून मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांना तेलंगणा राज्यातील वाहने आष्टी, सिरोंचा येथे सोडत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच खासगी वाहनांची सेवा बंद असल्याने एसटीशिवाय पर्याय नव्हता. अशा संकटकाळात एसटीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिले आहे. विशेष म्हणजे शारीरिक अंतर ठेवून प्रवाशी बसविल्याने एसटीच्या प्रवाशी क्षमतेच्या केवळ अर्धेच प्रवाशी बसविले जात होते. त्यामुळे एसटीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. तरीही एसटी बसगाड्या सोडण्यात आल्या. प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.आंध्रप्रदेश राज्यातून काही मजूर रेल्वेने देसाईगंज येथे आले. या प्रवाशांनाही त्यांच्या गावी सोडण्यात आले. काही प्रवाशी चालत गडचिरोलीपर्यंत पोहोचत होते. गडचिरोली येथील बसस्थानकात पोहोचल्यानंतर एसटीने सोडून देण्याची विनवणी करीत होते. अशाही प्रवाशांना एसटीने त्यांच्या गावार्यंत सोडून दिले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले. गावापर्यंत पोहोचलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर एसटीच्या मदतीमुळे हास्य उमलल्याचे दिसून येत होते.पायदळ मजूर आशेने गाठतात बसस्थानकचंद्रपूर व इतर जिल्ह्यातून काही मजूर अजूनही परत येत आहेत. सदर मजूर गडचिरोलीपर्यंत मालवाहू किंवा इतर साधनाने येतात. गडचिरोली येथे आल्यानंतर सर्वप्रथम बसस्थानक गाठतात. या मजुरांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी बसचालकांनी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अशा परिस्थितीत मजूर व सामान्य व्यक्तीच्या मदतीला एसटी धावून आली आहे.एसटीने आजपर्यंत अनेक चढ-उतार बघितले आहेत. एसटीने उत्पन्नापेक्षा सामाजिक जबाबदारीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत निम्मेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. एवढे प्रवाशी बसवून एसटी चालविणे कठीण आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत मजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी बसेस सोडण्यात आल्या. अडचणीच्या काळात एसटी मजुरांच्या मदतीसाठी धाऊन गेली, याचे समाधान आहे.- अशोककुमार वाडीभस्मे,विभाग नियंत्रक, गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी