शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान कोटींचे मदत लाखांत

By admin | Updated: July 19, 2014 01:07 IST

७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील चार वर्षात

वन्य प्राण्यांचे हल्ले : चार वर्षात नऊ लोकांचा मृत्यूदिगांबर जवादे  गडचिरोली७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील चार वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९ लोकांचा जीव गेला. तर ७९२ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र या सर्व बळींना केवळ तुटपूंजी मदत वनविभागाकडून देण्यात आली आहे, असाच प्रकार वन्य जीवांकडून शेतीच्या नुकसानीबाबतच्याही प्रकरणात झालेला आहे. जिल्ह्यात अर्ध्यापेक्षा अधिक गावे जंगलांनी व्यापली आहेत. या गावांमधील नागरिकांना दरवर्षीच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतोे. कधी वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान केले जाते तर कधी गाय, बैल, म्हैस, बकरी यासारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जातात. तर कधी प्रत्यक्ष नागरिकालाच वन्यप्राण्यांचा बळी बनण्याची वेळ येते. वन्यप्राणी ही वनविभागाची अमूल्य संपत्ती आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांकडून करण्यात आलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारीही वनविभागाचीच आहे. वन्यप्राण्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर शेतातील पीक फस्त केल्या जाते. वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून मदत मिळते. याची माहिती बहुतांश शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकरी याबद्दलची तक्रार वनविभागाकडे करीत नाही. एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर त्याचे प्रकरण मंजूर होऊन त्याला मदत मिळेलच याचीही शाश्वती राहत नाही. त्यामुळेच नुकसानभरपाई मिळण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. वन्यजीवांकडून पिकांचे नुकसान झाल्याचे २०१०-११ मध्ये १९ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्याअंतर्गत ६० हजार ४२० रूपयाची नुकसान भरपाई देण्यात आली. २०११-१२ मध्ये २९ प्रकरणे मंजूर झाली. त्याअंतर्गत १ लाख ३२ हजार २५० रूपये, २०१२-१३ मध्ये ८४ प्रकरणांना ३ लाख ५१ हजार २३० तर २०१३-१४ या वर्षात ३७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यांना १ लाख ४९ हजार ६६९ रूपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत देण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप होत आहे.गावातील नागरिकांची गुरे जंगलात चरण्यासाठी जातात. या जनावरांवर वाघ, बिबट आदी हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ले केले जातात. एक बैलजोडी किमान ३० हजार रूपयाशिवाय मिळत नाही. पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना मृत्यूमुखी पाडल्यासही देण्यात येणारी मदत अत्यंत कमी आहे. २०१०-११ मध्ये २२६ पाळीव प्राणी बिबट व वाघाकडून फस्त करण्यात आले. या प्राण्यांच्या मालकांना १३ लाख ८२ हजार १५३ रूपयाची मदत देण्यात आली. २०१०-११ या वर्षात २२ नागरिक जखमी झाले. त्यांना ५ लाख ४० हजार ७०१ रूपयाची मदत देण्यात आली. २०१२-१३ मध्ये ५० जखमी नागरिकांना २० लाख ५८ हजार ९२३ तर २०१३-१४ मध्ये जखमी झालेल्या ३६ नागरिकांना १७ लाख ६४ हजार ६०४ रूपयाची मदत देण्यात आली. २०१० ते २०१४ या कालावधीत ९ नागरिक हिंस्त्र प्राण्यांचे शिकार बनले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे १८ लाख रूपयाची मदत देण्यात आली आहे.