शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बँक शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करीत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन वाढल्याचा परिणाम : आठवड्याच्या पहिल्या दिवशी अहेरी शहर व तालुक्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र महाराष्टÑ सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविली. संचारबंदीची मुदत वाढल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारला बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. मात्र यावेळी कामाच्या घाईगडबडीत सोशल डिस्टन्सिंगची वाट लागल्याचे दिसून आले.गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मात्र खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करीत आहेत. मात्र शहरी भागात बऱ्याच ठिकाणी परिस्थिती यापेक्षा उलट आहे. १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय व सर्वच बँकांचे कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे आपले आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी ग्राहकांनी राष्टÑीयकृत बँकांमध्ये गर्दी केली. लगबगीने काम आटोपून घेण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.बँकांसारखीच किराणा दुकानांत लोकांची गर्दी दिसून आली. १ मीटरचे अंतर राखण्याबाबतचा नियम कोणीही पाळत नसल्याचे दिसून आले. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही नागरिकांनी अशीच गर्दी केली होती. पोलीस विभागातर्फे अनेक ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. मात्र नागरिक गल्लीबोळातून आपली वाट काढत फिरत असल्याचे चित्र अहेरी शहरात दिसून येत आहे.अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांना बँकेत गर्दी होत असल्याची माहिती कळताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, पोलीस उपनिरीक्षक आसावरी शेडके, पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, रूपा काळे यांच्यासह बँक कार्यालय गाठले. नागरिकांची गर्दी दूर केली. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.बँक आॅफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत सोमवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. बँक शाखा तसेच इतर शासकीय कार्यालयातर्फे नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी काहीच प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच नागरिकांची गर्दी झाली. तसेच नागरिक एकमेकांच्या जवळून रांग लावून होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.पेट्रोल पंपावर संचारबंदीचे उल्लंघनकोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. पेट्रोलपंप, किराणा दुकान, रूग्णालये, औषधी दुकान सुरू आहेत. मात्र अहेरी शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत असून संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. अहेरीच्या पेट्रोलपंपावर सध्यास्थिती पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी दिसते. तहसीलदारांनी पेट्रोल कोणा-कोणाला द्यायचे यासाठी २०३ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे विक्रेते, दूध व्यावसायिक तसेच अत्यावश्यक काम असलेल्या कर्मचाºयांना पेट्रोल दिले जात आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करून व सुरक्षित अंतर ठेवून वाहनधारकांनी पेट्रोल टाकणे गरजेचे आहे. मात्र अहेरीच्या पेट्रोलपंपावर वाहनधारकांची गर्दी होत असून सामाजिक डिस्टन्सिंगची वाट लागली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या