शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

नत्र व स्फुरदची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

ठळक मुद्देमृद चाचणीचे निष्कर्ष : जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ४८ हजार ९७२ हेक्टर एवढे आहे. जमिनीचा उतार तीन टक्के एवढा आहे. जमिनीच्या पोतानुसार पिकांना खताची मात्रा देता यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाची निवड करताना मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने जमिनीची चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये जमिनीत नेमके कोणते गुणधर्म आहेत, हे तपासले जाते. २०१७-१८ या वर्षात सुमारे १९ हजार ९७३ मृद नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी तयार करण्यात आली आहे. नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्माचा सुपिकता निर्देशांक अनुक्रमे १.२, १.३३ व २.४० एवढा आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्र व स्फुरद गुणधर्माची सुपिकता पातळी कमी असल्याने या दोन्ही खतांची मात्रा २५ टक्के अधिक द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर असल्याने पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी देण्याचा सल्ला दिला आहे.८४ टक्के जमीन आम्लधर्मीगडचिरोली जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमीन सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आहे. जमिनीची क्षारता सर्वसाधारण असून सर्व पिकांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. सुक्ष्म मूलद्रव्यांमध्ये जस्त व लोहाची कमतरता आढळून आली आहे. त्याकरिता झिंक सल्फेट २५ ते ३० किलो प्रती हेक्टरी देण्यास सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आढळून आला आहे.कोरडवाहू क्षेत्राचा विकासगडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकरी पीक घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे सदर जमीन पडिक राहते. या जमिनीचा विकास करण्यासाठी शासनाने राष्टÑीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षात ८८.८४ लाख रूपयांचे लक्षांक प्राप्त झाले. त्यापैकी ७२ लाख ३९ हजार रूपये अनुदानावर खर्च झाले आहेत. २२९ लाभार्थ्यांच्या शेतीचा विकास करण्यात आला आहे.शेतकºयांना मार्गदर्शनाची गरजजमिनीच्या पोतानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यायची असतानाही बहुतांश शेतकरी सरसकट मिश्रखतांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी आहे. ही बाब केवळ कागदोपत्री आहे. मात्र शेतकºयांना याची माहिती नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा नेमक्या कोणत्या प्रमाणात खत द्यायचे, याबाबत मार्गदर्शन करीत नाही. परिणामी शेतकरी आपल्या पारंपारीक रितीने खत मात्रा देतात.