शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नत्र व स्फुरदची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

ठळक मुद्देमृद चाचणीचे निष्कर्ष : जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ४८ हजार ९७२ हेक्टर एवढे आहे. जमिनीचा उतार तीन टक्के एवढा आहे. जमिनीच्या पोतानुसार पिकांना खताची मात्रा देता यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाची निवड करताना मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने जमिनीची चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये जमिनीत नेमके कोणते गुणधर्म आहेत, हे तपासले जाते. २०१७-१८ या वर्षात सुमारे १९ हजार ९७३ मृद नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी तयार करण्यात आली आहे. नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्माचा सुपिकता निर्देशांक अनुक्रमे १.२, १.३३ व २.४० एवढा आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्र व स्फुरद गुणधर्माची सुपिकता पातळी कमी असल्याने या दोन्ही खतांची मात्रा २५ टक्के अधिक द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर असल्याने पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी देण्याचा सल्ला दिला आहे.८४ टक्के जमीन आम्लधर्मीगडचिरोली जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमीन सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आहे. जमिनीची क्षारता सर्वसाधारण असून सर्व पिकांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. सुक्ष्म मूलद्रव्यांमध्ये जस्त व लोहाची कमतरता आढळून आली आहे. त्याकरिता झिंक सल्फेट २५ ते ३० किलो प्रती हेक्टरी देण्यास सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आढळून आला आहे.कोरडवाहू क्षेत्राचा विकासगडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकरी पीक घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे सदर जमीन पडिक राहते. या जमिनीचा विकास करण्यासाठी शासनाने राष्टÑीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षात ८८.८४ लाख रूपयांचे लक्षांक प्राप्त झाले. त्यापैकी ७२ लाख ३९ हजार रूपये अनुदानावर खर्च झाले आहेत. २२९ लाभार्थ्यांच्या शेतीचा विकास करण्यात आला आहे.शेतकºयांना मार्गदर्शनाची गरजजमिनीच्या पोतानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यायची असतानाही बहुतांश शेतकरी सरसकट मिश्रखतांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी आहे. ही बाब केवळ कागदोपत्री आहे. मात्र शेतकºयांना याची माहिती नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा नेमक्या कोणत्या प्रमाणात खत द्यायचे, याबाबत मार्गदर्शन करीत नाही. परिणामी शेतकरी आपल्या पारंपारीक रितीने खत मात्रा देतात.