शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नत्र व स्फुरदची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

ठळक मुद्देमृद चाचणीचे निष्कर्ष : जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ४८ हजार ९७२ हेक्टर एवढे आहे. जमिनीचा उतार तीन टक्के एवढा आहे. जमिनीच्या पोतानुसार पिकांना खताची मात्रा देता यावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाची निवड करताना मार्गदर्शक ठरावे, या उद्देशाने जमिनीची चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये जमिनीत नेमके कोणते गुणधर्म आहेत, हे तपासले जाते. २०१७-१८ या वर्षात सुमारे १९ हजार ९७३ मृद नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी तयार करण्यात आली आहे. नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्माचा सुपिकता निर्देशांक अनुक्रमे १.२, १.३३ व २.४० एवढा आढळून आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्र व स्फुरद गुणधर्माची सुपिकता पातळी कमी असल्याने या दोन्ही खतांची मात्रा २५ टक्के अधिक द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर असल्याने पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी देण्याचा सल्ला दिला आहे.८४ टक्के जमीन आम्लधर्मीगडचिरोली जिल्ह्यातील एकूण जमिनीच्या ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमीन सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आहे. जमिनीची क्षारता सर्वसाधारण असून सर्व पिकांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. सुक्ष्म मूलद्रव्यांमध्ये जस्त व लोहाची कमतरता आढळून आली आहे. त्याकरिता झिंक सल्फेट २५ ते ३० किलो प्रती हेक्टरी देण्यास सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आढळून आला आहे.कोरडवाहू क्षेत्राचा विकासगडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकरी पीक घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे सदर जमीन पडिक राहते. या जमिनीचा विकास करण्यासाठी शासनाने राष्टÑीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ या वर्षात ८८.८४ लाख रूपयांचे लक्षांक प्राप्त झाले. त्यापैकी ७२ लाख ३९ हजार रूपये अनुदानावर खर्च झाले आहेत. २२९ लाभार्थ्यांच्या शेतीचा विकास करण्यात आला आहे.शेतकºयांना मार्गदर्शनाची गरजजमिनीच्या पोतानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यायची असतानाही बहुतांश शेतकरी सरसकट मिश्रखतांचा वापर करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील जमिनीत पालाशचे प्रमाण अधिक आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी आहे. ही बाब केवळ कागदोपत्री आहे. मात्र शेतकºयांना याची माहिती नाही. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा नेमक्या कोणत्या प्रमाणात खत द्यायचे, याबाबत मार्गदर्शन करीत नाही. परिणामी शेतकरी आपल्या पारंपारीक रितीने खत मात्रा देतात.