शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उपबाजार समितीत सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 16, 2014 22:50 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

देसाईगंज : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच देसाईगंज येथे बाजारपेठ अस्तित्वात आहे. पूर्वी या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वनोपज धान्य विक्रीस आणल्या जात होते. यावरूनच या शहराला देसाईगंज असे नाव पडले. तेव्हापासून तब्बल ८० वर्षाचा कालावधी उलटूनही येथील धान्यबाजारपेठेच्या समस्या सुटल्या नाही. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत देसाईगंज उपबाजार समिती येते. देसाईगंज बाजार समितीमध्ये कोट्यवधीची उलाढाल दरवर्षी होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीला देसाईगंज उपबाजार समितीपासूनच सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे देसाईगंजला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अजूनपर्यंत शासनाने याला हिरवी झेंडी दर्शविलेली नाही.बाजार समितीची मुख्य इमारत अत्यंत जीर्णावस्थेपर्यंत पोहोचली असून केव्हाही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाजारपेठ ८८ आर. जागेत व्यापली आहे. मात्र अजूनपर्यंत या परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खाली ताडपत्री अंथरून धान्य ठेवावे लागते. शेतकऱ्यांना या ठिकाणी थांबण्यास किंवा थोडीफार विश्रांती करण्यास कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्या सोयीसाठी एखादी कॅन्टीन उघडने आवश्यक होते. मात्र याकडे उपबाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या महिला व पुरूषांसाठी मुत्रीघर व शौचालयाचीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते. बाजारपेठेत दरदिवशी शेकडो वाहने धान्य घेऊन बाजार समितीत येतात. सदर वाहने पार्कींग करण्यासाठी सुद्धा जागा नाही. अनेक वाहने धानाच्या ढिगावरूनच आवागमन करतात. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. (तालुका प्रतिनिधी)