शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बसफेरीअभावी पायपीट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:01 IST

खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देआवलमरी परिसरातील नागरिक संतप्त : बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करणार

मुन्ना कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कव्यंकटापूर : अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर परिसरात अनेक गावे आहेत. या गावांमध्ये बसफेरी काही वर्षांपर्यत सुरू होती; परंतु खराब रस्त्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली, तेव्हापासून अद्यापही व्यंकटापूर-आवलमरी-रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या मार्गे बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अहेरी-व्यंकटापूर-आवलमारी-रेगुंठा बस सेवा काही वर्षांपूर्वी सुरळीत चालू होती. मात्र सदर मार्गावरील रस्ता पेद्दावट्रा- रेगुंठापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असल्याचे कारण दाखवून या मार्गावरील बसफेरी बंद करण्यात आली. सध्या या मार्गाचे खडीकरण, डांबरीकरण झाले आहे. रस्ता सुस्थितीत आहे. पक्का रस्ता तयार झाल्याने रहदारीही वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेरी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.विशेष म्हणजे, आगर व्यवस्थापकांना निवेदन देऊन बस सेवाफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बसफेरी सुरू करण्याच्या मागणीचा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत मंजूर करून तो आगर व्यवस्थापकांना पाठविला. परंतु अद्यापही बसफेरी सुरू झाली नाही. दुर्गम भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. व्यंकटापूर, आवलमरी, रेगुंठा परिसरात बसफेरी सुरू न केल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या मार्गे बसफेरी सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.रूग्णांच्याही हालअपेष्टाव्यंकटापूर व रेगुंठा भागात वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. या परिसरातील नागरिकांना पायी तसेच खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेकदा नागरिक पायी अहेरीपर्यंत पायवाटेने जंगलातून येतात. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यांना साधने उपलब्ध होत नाही. रुग्णांनासुद्धा वेळीच साधने मिळत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी वाटेतच रुग्ण दगावल्याच्या घटना या भागात घडल्या आहेत. व्येंकटापूर, आवलमारी, रेगुंठा या परिसरात बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांसाठी सोय होईल. जंगलातून तसेच पायवाटेने नागरिक ये-जा करतात, तेही थांबण्यास मदत होईल.