शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात २१ टक्के पावसाची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST

गडचिरोली : अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपला असला तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी पिकांसोबत ...

गडचिरोली : अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपला असला तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी पिकांसोबत पिण्याच्या पाण्याचीही समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८७२.७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ६९०.४ मि.मी. पाऊस बरसला आहे. हे प्रमाण ७९.१ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८४८.६ मि.मी. पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे; पण दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. सिरोंचा तालुक्यात ७७५ मि.मी. पाऊस बरसला आहे. मात्र, १७ ऑगस्टपर्यंत या तालुक्यात सरासरी ७५० मि.मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेला पाऊस जास्त असून, हे प्रमाण १०३.३ टक्के आहे.

पावसाचे हे प्रमाण शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या अनेक भागांत धानाची रोवणी होऊ न शकल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

(बॉक्स)

गडचिरोली, धानोरा तालुक्यात सर्वाधिक वाईट स्थिती

जिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची सर्वांत वाईट स्थिती धानोरा तालुक्यात आहे. या तालुक्यात अवघा ५७ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय गडचिरोली तालुक्यातही ६३ टक्केच पाऊस बरसला आहे. बाकी तालुक्यांमध्ये ७० ते ८५ टक्के पाऊस बरसल्याचे दिसून येते. धानोरा तालुक्यात सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे पिकांची स्थिती वाईट आहे.

(बॉक्स)

गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

गेल्या वर्षी म्हणजे १७ ऑगस्ट २०२० पर्यंत जिल्ह्यात ८२३ मि.मी. पाऊस बरसला होता. सरासरीच्या तुलनेत तो ९४.४ मि.मी. होता. यावर्षी मात्र ६९० मि.मी.च झाला असून, त्याची सरासरी ७९.१ मि.मी. एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाऊस कमी आहे. पुढील दीड महिन्यात ही कसर भरून निघणार का, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.