शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कुनघाडा रै. येथील धान केंद्र १५ दिवसांपासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही.

ठळक मुद्देशेकडो पोती पडून : गोदाम फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : गोदाम फुल्ल झाल्याचे कारण पुढे करून कुनघाडा रै. येथील धान खरेदी केंद्र मागील १५ दिवसांपासून बंद आहे. शेकडो क्विंटल शेतकऱ्यांचे धान केंद्र परिसरात काटा न होताच पडून आहेत.राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही. धान खरेदी केंद्रावर धानाचे वजन करण्यासाठी एकच काटा आहे. त्यामुळे धान खरेदी अतिशय संथपणे होत होती. प्रत्येक गावासाठी विशिष्ट दिवस नेमून दिला होता. सातबारा दिलेल्या शेतकºयांपैकी केवळ ७० शेतकऱ्यांच्याच धानाचा काटा केला आहे. उर्वरित धानाचा काटा झाला नाही. गोदाम फुल्ल झाला असल्याने धान खरेदी करणे शक्य नाही, असे कारण सांगितले जात आहे.केंद्रावर शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोते पडून आहेत. शेतकरी दरदिवशी केंद्रात जाऊन धानाची राखन करीत आहेत. धान खरेदीला नेमके कधी सुरूवात होईल, याचे उत्तर केंद्रातील व्यवस्थापकाकडून दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस झाल्यास या ठिकाणच्या धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कर्ज भरण्याची तारीख आली जवळबहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. सदर कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास व्याज माफ केले जाते. ३१ मार्च नंतर एक दिवसही अधिकचा झाला तर संपूर्ण वर्षभराचे व्याज आकारले जाते. शेतकऱ्यांकडे धान आहेत. मात्र त्याची विक्री झाली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान विकले आहे, त्याचे पैसे मिळाले नाही. कर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे. मात्र पैसे जवळ नसल्याने कर्ज कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासनाच्या चुकीमुळे अनेकांचे कर्ज थकीत पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड