शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

कुनघाडा रै. येथील धान केंद्र १५ दिवसांपासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही.

ठळक मुद्देशेकडो पोती पडून : गोदाम फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : गोदाम फुल्ल झाल्याचे कारण पुढे करून कुनघाडा रै. येथील धान खरेदी केंद्र मागील १५ दिवसांपासून बंद आहे. शेकडो क्विंटल शेतकऱ्यांचे धान केंद्र परिसरात काटा न होताच पडून आहेत.राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही. धान खरेदी केंद्रावर धानाचे वजन करण्यासाठी एकच काटा आहे. त्यामुळे धान खरेदी अतिशय संथपणे होत होती. प्रत्येक गावासाठी विशिष्ट दिवस नेमून दिला होता. सातबारा दिलेल्या शेतकºयांपैकी केवळ ७० शेतकऱ्यांच्याच धानाचा काटा केला आहे. उर्वरित धानाचा काटा झाला नाही. गोदाम फुल्ल झाला असल्याने धान खरेदी करणे शक्य नाही, असे कारण सांगितले जात आहे.केंद्रावर शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोते पडून आहेत. शेतकरी दरदिवशी केंद्रात जाऊन धानाची राखन करीत आहेत. धान खरेदीला नेमके कधी सुरूवात होईल, याचे उत्तर केंद्रातील व्यवस्थापकाकडून दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस झाल्यास या ठिकाणच्या धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कर्ज भरण्याची तारीख आली जवळबहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. सदर कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास व्याज माफ केले जाते. ३१ मार्च नंतर एक दिवसही अधिकचा झाला तर संपूर्ण वर्षभराचे व्याज आकारले जाते. शेतकऱ्यांकडे धान आहेत. मात्र त्याची विक्री झाली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान विकले आहे, त्याचे पैसे मिळाले नाही. कर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे. मात्र पैसे जवळ नसल्याने कर्ज कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासनाच्या चुकीमुळे अनेकांचे कर्ज थकीत पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड