शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गडचिरोलीतही होऊ शकतो 'कुंडमळा' ; आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:39 IST

Gadchiroli : अरुंद, विनाकठड्यांच्या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटनस्थळावर इंद्रायणी पुलावरील लोखंडी पूल कोसळून चौघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आदिवासीबहुल व माओवादप्रभावित गडचिरोलीतील रस्ते व पुलांची अवस्था पाहता येथेही 'कुंडमळा' होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आरमोरी मार्गावर चार पूल धोकादायक असून दक्षिण गडचिरोलीत डझनभर पुलांची कामे खोळंबलेली आहेत. दुसरीकडे उत्तर गडचिरोलीत तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पूल खचल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. 'कुंडमळा' घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामांची ही झाडाझडती. 

५०० कोटी एवढे बजेट आरमोरी-गडचिरोली महामार्गाचे झाले आहे. ब्रह्मपुरीपर्यंत समृद्धी महामार्ग होणार असल्याने जिल्ह्यातील रहदारी वाढू शकते. त्यामुळे हा महामार्ग आता दुपदरी ऐवजी चौपदरी होईल. 

पुलाला पडल्या भेगाअहेरी तालुक्यातील लक्ष्मण नाल्यावरील पुलाला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो.

या पुलांवरुन जाताना इकडे-तिकडे पाहू नकाआरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) वर चार पूल अरुंद असून कठडेही गायब आहेत. त्यामुळे तेथून प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तथून आरमोरीजवळ गाढवी नदीवर, डोंगरगाव (भु.) जवळच्या खोब्रागडी नदीवर, वसाजवळच्या कोलांडी नाल्यावर तसेच साखराजवळच्या पाल नदीवरील पुलांचा यात समावेश आहे. या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली