शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाने एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:55 IST

महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे. राजकीय व्यवस्थेने ओबीसी व कुणबी समाजाची पूर्णत: वाट लावली आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीही प्रचंड अडचणीत सापडला आहे. आता शेतकरी व कुणबी समाजाला वाचवून त्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी कुणबी समाजाने सदैव जागृत राहून कायम एकसंघ राहावे, असा सूर माजी खासदार नाना पटोले, आमदार बाळू धानोरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढला.कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर कुणबी महामेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या मेळाव्यााला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नाना पटोले, आमदार सुनिल केदार, आमदार बाळू धानोरकर तर वक्ते म्हणून प्रसिध्द साहित्यीक तथा कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रा. दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डाफ, प्रफुल गुळधे पाटील, नरेंद्र जिचकार उपस्थित होते.कुणबी समाज उन्नत व प्रगत नाही. त्यामुळे या समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धीच शिष्यवृत्ती मिळते, वसतिगृहाची सोय नाही. त्यामुळे शिक्षण घेताना ओबीसी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब दारिद्र्याच्या खाईत जात आहेत, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २० हजारांवर कुणबी समाज बांधवांनी हजेरी लावली होती. महिला व युवतींचीही या महामेळाव्यात लक्षणिय उपस्थिती होती. याप्रसंगी आ.सुनिल केदार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राह्मणवाडे, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार धनपाल मिसार यांनी मानले.मान्यवरांचा सूर : कुणबी महामेळाव्याला २० हजारपेक्षा अधिक समाजबांधवांची उपस्थितीमतपेटीतून एकता दिसू द्या - ज्ञानेश वाकुडकरसरकारला गायीच्या मूत्राची किंमत आहे. मात्र शेतकरी आत्महत्येचे काहीही देणेघेणे नाही. जात कुणबी, धर्म कुणबी, पक्ष कुणबी, संघटना कुणबी या तत्वाने मार्गक्रमण करून शेतकरी विरोधी राजकीय नेत्यांना धडा शिकवा, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कुणबी समाज बांधवाने या मेळाव्यासारखीच मतपेटीतून एकता दाखवून यापुढे महाराष्टÑाचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा बनवा असे आवाहन साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी यावेळी केले.हक्क नाकारणाºयांना धडा शिकवा - चौधरीमाणसाला अर्थात शेतकऱ्याला मारून भारत महासत्ता कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करून चांगले व वाईट काय हे समजून घेऊन त्यानुसार जीवनात मार्गक्रमण करा. निवडून दिलेले पुढारी आपले ऐकत नसतील तर त्यांना निवडणुकीत पाडता आले पाहिजे. सध्या भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्ये लागली आहे. कुणबी, ओबीसी समाज व शेतकऱ्यांचे हक्क नाकारणाºया नेत्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.अन्याय खपवून घेणार नाही - वैष्णवी डाफशेतकऱ्यांच्या समस्येवर छत्रपती शिवाजी महाराज कटाक्षाने लक्ष देत होते. शिवाजी महाराजांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते. मात्र आता शेतकरी, कुणबी व ओबीसी समाजावर सर्वच क्षेत्रात शासनाकडून अन्याय होत आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांला त्यांनी पिकवलेलया धानाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. हा अन्याय कुणबी समाज बांधव आता खपवून घेणार नाही, असा इशारा वैष्णवी डाफ यांनी दिला.स्मार्ट व्हिलेज कधी होणार - मेघा रामगुंडे५२ टक्के लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे, आम्हाला भिक नको तर आमचे अधिकार व हक्क द्या, अशी मागणी करीत विद्यमान सरकार स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन करण्यावर भर देत आहे. मात्र देशात व महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकारचे खेडेगावाकडे दुर्लक्ष आहे. स्मार्ट व्हिलेज कधी होणार, ग्रामीण भागातील शेतकरी केव्हा प्रगत होणार असा सवाल मेघा रामगुंडे यांनी केला.

टॅग्स :kunbiकुणबी