शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कुचेर गावाने विकला वजनानुसार बांबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:08 IST

आजपर्यंत बांबूची विक्री नगाप्रमाणे केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यातील कुचेर ग्रामपंचायतीने बल्लारपूर पेपरमिलला वजनाप्रमाणे बांबू विकण्यास सुरूवात केली आहे. याबाबतचा करारही पूर्ण झाला असून बांबूचे ट्रक रवाना सुध्दा झाले आहेत. तब्बल दोन वर्षापासून थांबलेले बांबूचे व्यवहार पुन्हा सुरूवात झाल्यामुळे ग्रामसभांना आता ‘अच्छे दिन’ येण्याची आशा बळावली आहे.

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण प्रयोग : अनेक वर्षांपासून रखडलेल्या बांबू विक्रीला मिळणार चालना

रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आजपर्यंत बांबूची विक्री नगाप्रमाणे केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यातील कुचेर ग्रामपंचायतीने बल्लारपूर पेपरमिलला वजनाप्रमाणे बांबू विकण्यास सुरूवात केली आहे. याबाबतचा करारही पूर्ण झाला असून बांबूचे ट्रक रवाना सुध्दा झाले आहेत. तब्बल दोन वर्षापासून थांबलेले बांबूचे व्यवहार पुन्हा सुरूवात झाल्यामुळे ग्रामसभांना आता ‘अच्छे दिन’ येण्याची आशा बळावली आहे.जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू आहेत. बांबूचा दर्जा अतिशय चांगला असल्याने बांबूला चांगली किंमत व मागणी आहे. यापूर्वी वन विभाग बल्लारपूर पेपरमिलला बांबूची विक्री करीत होते. मात्र पेसा कायद्यानुसार आता सभोवतालचे जंगल ग्रामसभांच्या मालकीचे झाले असल्याने वन विभागाने बांबू विक्रीतून आपले अंग काढले आहे. ग्रामसभांना जरी बांबू विक्रीचे अधिकार प्राप्त झाले असले तरी बांबूची तोड करून त्याची विक्री कशी करावी, याचे कौशल्य नसल्याने बांबू जंगलातच पडून राहत होता. काही वर्षानंतर बांबूचे झाड करपून ते कुजते. अशा पध्दतीने जिल्हाभरातील शेकडो कोटी रूपयांचा बांबू जंगलातच नष्ट होत होता.भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनी बांबूची विक्री यापुढे वजनाप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. टेकला ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या कुचेर ग्रामवासीयांना सोबत घेऊन सुखराम मडावी यांनी बल्लारपूर गाठले. तेथील पेपरमिलच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. चर्चेमध्ये ४ हजार ५०० रूपये टनाप्रमाणे बांबू विक्रीचा सौदा पार पडला. यामध्ये वाहतूक खर्च, सर्व्हिस टॅक्स देण्याची जबाबदारी पेपरमिलची राहिल. तर रस्ते दुरूस्त करणे, दोरी व इतर खर्च ग्रामसभा करेल, असे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, आजपर्यंत ट्रक किंवा बांबूच्या नगाप्रमाणे बांबूची विक्री केली जात होती. मात्र आता वजनाप्रमाणे बांबूची विक्री केली जाणार असून अशा पध्दतीने विक्री करणारे कुचेर हे जिल्ह्यातील पहिले गाव असण्याची शक्यता आहे.बल्लारपूर पेपरमिलला मोठ्या प्रमाणात बांबूची आवश्यकता भासते. त्यामुळे बांबू तोडाईच्या माध्यमातून शेकडो स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ग्रामसभेलाही अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होईल.संपूर्ण व्यवहार होणार कॅशलेसआर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी बांबू विक्रीची संपूर्ण रक्कम ग्रामसभेच्या खात्यात धनादेशाद्वारे जमा केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत रोकड स्वीकारली जाणार नाही. भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू आहे. या बांबूची विक्री होत नसल्याने सदर बांबू जंगलातच सडत आहे. मात्र बांबूला नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे. देशपातळीवर भामरागडचा बांबू पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.