शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST

नऊ किलोमीटरच्या घाटाच्या सुरवातीपासूनच्या वळणावरुन तर घाट संपल्यावरही समोर खड्डे पडले आहेत. जवळपास १४ किलोमीटर बेडगाव पासूनतर पुराडापर्यंत असे ...

नऊ किलोमीटरच्या घाटाच्या सुरवातीपासूनच्या वळणावरुन तर घाट संपल्यावरही समोर खड्डे पडले आहेत. जवळपास १४ किलोमीटर बेडगाव पासूनतर पुराडापर्यंत असे अनेक जीवघेणे खड्डे या राष्ट्रीय महामार्गावर पडले आहेत. मागील वर्षीच या रोडचे डांबरीकरण झाले. जेव्हा डांबरीकरणाचे काम सुरू होते त्या दिवशी खूप पाऊस येत होता. तरीही कंत्राटदाराने काम सुरू ठेवले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वर्ष पूर्ण होण्याआधीच रस्त्यावरचे डांबर उखडून खड्डे पडले आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे व डागडुजीचे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे डागडुजी काम झाले नेमके त्याच ठिकाणी या पावसाळ्यात तलावासारखे मोठमोठे खड्डे पडले आहे.

छत्तीसगड राज्यावरून रायपूर-राजनांदगाववरून कोरची मार्गे कुरखेडा-गडचिरोली-चंद्रपूरकडे रात्रंदिवस अनेक अवजड वाहनांची वर्दळ राहते. या राष्ट्रीय मार्गावर करोडो रुपयांची रस्त्याची कामे कंत्राटदाराकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केल्याचे प्रवासी नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच लवकरच या महामार्गावर पुन्हा खड्डे पडत आहेत. अशी नागरिकांमध्ये सतत चर्चा सुरू राहते तसेच या मार्गावरील खड्ड्यामुळे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या सदर काम करणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स :

अनेकदा घडले अपघात

या नऊ किलोमीटरच्या घाटावर अपघात झाले तर वाहन सरळ दरीत कोसळल्याशिवाय राहत नाही आणि कोसळले तर माणूस जिवंत राहण्याची किंवा वाचण्याची शक्यताच नसते. तशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली. चंद्रपूरवरून कोरचीला बदली झालेल्या एका पोस्टमास्तर कर्मचाऱ्याला कोरचीत सोडून परत चंद्रपूरला निघालेले चारचाकी वाहन कार परतीच्यावेळी याच घाटावरील दरीत कोसळले आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. असे अनेक अपघात या घाटावर व या मार्गावर घडले आहेत. कित्येक ट्रकही या खड्ड्यांमुळे उलटले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आता वाहनचालकांना त्रासदायक व जीवघेणा बनला आहे.

बाॅक्स :

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

दरवर्षी या महामार्गाची अनेकदा डागडुजी केली जाते मात्र डागडुजीनंतरही अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था हाेते. पुन्हा या महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त हाेत. मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या महामार्गावरील पडलेल्या खड्ड्याची पुन्हा डागडुजी न करता या महामार्गावरील रस्त्याचे काम नव्याने व उच्च दर्जाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.