शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST

नऊ किलोमीटरच्या घाटाच्या सुरवातीपासूनच्या वळणावरुन तर घाट संपल्यावरही समोर खड्डे पडले आहेत. जवळपास १४ किलोमीटर बेडगाव पासूनतर पुराडापर्यंत असे ...

नऊ किलोमीटरच्या घाटाच्या सुरवातीपासूनच्या वळणावरुन तर घाट संपल्यावरही समोर खड्डे पडले आहेत. जवळपास १४ किलोमीटर बेडगाव पासूनतर पुराडापर्यंत असे अनेक जीवघेणे खड्डे या राष्ट्रीय महामार्गावर पडले आहेत. मागील वर्षीच या रोडचे डांबरीकरण झाले. जेव्हा डांबरीकरणाचे काम सुरू होते त्या दिवशी खूप पाऊस येत होता. तरीही कंत्राटदाराने काम सुरू ठेवले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वर्ष पूर्ण होण्याआधीच रस्त्यावरचे डांबर उखडून खड्डे पडले आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे व डागडुजीचे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे डागडुजी काम झाले नेमके त्याच ठिकाणी या पावसाळ्यात तलावासारखे मोठमोठे खड्डे पडले आहे.

छत्तीसगड राज्यावरून रायपूर-राजनांदगाववरून कोरची मार्गे कुरखेडा-गडचिरोली-चंद्रपूरकडे रात्रंदिवस अनेक अवजड वाहनांची वर्दळ राहते. या राष्ट्रीय मार्गावर करोडो रुपयांची रस्त्याची कामे कंत्राटदाराकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केल्याचे प्रवासी नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच लवकरच या महामार्गावर पुन्हा खड्डे पडत आहेत. अशी नागरिकांमध्ये सतत चर्चा सुरू राहते तसेच या मार्गावरील खड्ड्यामुळे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या सदर काम करणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हाेत आहे.

बाॅक्स :

अनेकदा घडले अपघात

या नऊ किलोमीटरच्या घाटावर अपघात झाले तर वाहन सरळ दरीत कोसळल्याशिवाय राहत नाही आणि कोसळले तर माणूस जिवंत राहण्याची किंवा वाचण्याची शक्यताच नसते. तशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली. चंद्रपूरवरून कोरचीला बदली झालेल्या एका पोस्टमास्तर कर्मचाऱ्याला कोरचीत सोडून परत चंद्रपूरला निघालेले चारचाकी वाहन कार परतीच्यावेळी याच घाटावरील दरीत कोसळले आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. असे अनेक अपघात या घाटावर व या मार्गावर घडले आहेत. कित्येक ट्रकही या खड्ड्यांमुळे उलटले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आता वाहनचालकांना त्रासदायक व जीवघेणा बनला आहे.

बाॅक्स :

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

दरवर्षी या महामार्गाची अनेकदा डागडुजी केली जाते मात्र डागडुजीनंतरही अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था हाेते. पुन्हा या महामार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त हाेत. मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या महामार्गावरील पडलेल्या खड्ड्याची पुन्हा डागडुजी न करता या महामार्गावरील रस्त्याचे काम नव्याने व उच्च दर्जाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.