शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोनसरीचा लोहखनिज प्रकल्प गुंडाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:06 IST

मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलोहदगडाचे उत्खनन बंद : संरक्षणाअभावी कंपनी काम बंद करण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुबलक प्रमाणात लोहखनिज असलेल्या सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम गेल्या ५ महिन्यांपासून ठप्प आहे. पोलिसांकडून संरक्षण मिळत नसल्यामुळे हे काम बंद आहे. या परिस्थितीला वैतागून लॉयड्स मेटल्स कंपनी हे काम गुंडाळण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या रुपात हजारो बेरोजगारांनी पाहिलेले रोजगाराचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या पहाडाच्या पोटात मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. त्या कच्च्या खनिजाचे शुद्धीकरण करून शुद्ध लोह काढण्याचा प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे प्रस्तावित आहे. दोन वर्षापूर्वी घाईघाईने मुख्यमंत्र्यांनी येऊन त्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. नंतर शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यापासून तर एमआयडीसीकडून ती जागा लॉयड्स मेटल्स कंपनीला हस्तांतरित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेसाठी सव्वा वर्ष निघून गेले. परंतू नंतरही हे काम ठप्पच आहे.औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार अनेक उद्योजकांना विविध प्रकारे प्रोत्साहन आणि सवलती देत असताना गडचिरोलीत मात्र उलटे चित्र तयार झाले आहे. लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत कोणाकडूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे हे काम पुढे चालू ठेवणे कठीण असून त्यामुळे कंपनी आपले काम गुंडाळण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून समजते. दिवसाला एक हजार टन लोहदगडाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असणाºया कोनसरीच्या प्रकल्पाला तेवढा कच्चा माल नियमितपणे मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात जाऊ शकतो. म्हणूनच कोनसरीतील प्रकल्प उभारणीच्या कामाला कंपनीने अद्याप सुरूवात केली नसल्याचे सांगितले जात आहे.लोकप्रतिनिधींना बसणार फटका !लोहखाणीतील कच्चा माल काढण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत होते. ते काम पाच महिन्यांपासून बंदच आहे. यानंतर कोनसरीतील कारखान्यात कुशल कामगारांना नियमित नोकरी लागण्याचे स्वप्नही आता भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबत बेरोजगार युवकांना ट्रकमालक बनविण्याचे स्वप्नही भंगणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रस्त्याचे कामही ठप्पचगेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरजागडमधील लोहखनिज लॉयड्स मेटल्स कंपनीच्या घुग्गुस येथील लोहप्रकल्पात नेले जात होते. परंतू एका अपघाताचे निमित्त झाले आणि लोहखनिजाची वाहतूक बंद झाली. ज्या मार्गाने लोहखनिजाचे ट्रक जातात त्या मार्गाचे रूंदीकरणाचे काम तातडीने करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्या कामाची निविदा प्रक्रियाही आधीच झाली होती. परंतू आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कंपनीने गेल्या सहा महिन्यात त्यासाठी लागणारी पुढची प्रक्रियाच (बँक सिक्युरिटी) केली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया अर्धवट स्थितीत पडून असून सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.नक्षलवादी मानसिकेचा विजयविशेष म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण देण्यासाठी पोलीस महासंचालकांनी सुरजागड पहाडावर स्वतंत्र उपपोलीस स्टेशन मंजूर केले आहे. पण अलिकडे वाढलेल्या नक्षलवादी कारवायांमुळे पोलीस लोहखनिजाच्या कामासाठी किंवा वाहतुकीसाठी संरक्षण देण्यास तयार नाहीत. पोलीस हिमत दाखवून कोणतीही ‘रिस्क’ घेण्यास तयार नसल्यामुळे हा पोलिसांचा पराजय आणि नक्षलवादी मानसिकता ठेवणाऱ्यांचा विजय असल्याचेही बोलले जात आहे. याचा सर्वाधिक फटका बेरोजगार युवकांना बसणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस