शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:17 IST

अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देपंचांग औपचारिकता : वऱ्हाड्यांच्या नाचगाण्यांमुळे लग्न तिथीची ऐसीतैसी

प्रदीप बोडणे।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.सनई चौघडाचे मंगल सूर कानी पडताच लग्नाचा मुहूर्त जवळ आला म्हणून वधू मंडळीची एकच धावपळ सुरू होते आणि जानोश्यावर नवरदेव निघाल्याचे वृत्त धडकताच नवदेवाला ओवाळण्यासाठी आणि वराकडील मंडळीच्या स्वागतासाठी पंचआरती घेऊन सुहासिनी सज्ज असतात. परंतु वधू मंडळीला वर पोहोचायला दोन तास वेळ आहे, अशी माहिती मिळते आणि साऱ्यांचा हिरमोड होतो.लग्नपत्रिका, पंचांग मुहूर्त हे सगळे सोपस्कार भावी वधू-वराच्या मांगल्यासाठी असतील तर वराकडील मंडळीच्या नाचगाण्यामुळे लग्न तिथी टाळणे योग्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लग्न तिथीचे तंतोतंत पालन करणारा म्हणून कोहळी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. वरातीतील नाचगाणे कितीही करा, पण मुहूर्त टळू देणार नाही आणि यासाठी कुठलीही सबब सांगू दिल्या जात नाही. वराकडील मंडळीकडून तसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे भोजनावळी आटोपून पाहुणे लग्न मंडळी वेळेवर ईच्छित स्थळी पोहोचणे सोयीचे होते. इतर ठिकाणी लग्नाचा मुहूर्त सकाळी ११ वाजता आणि विवाह लागतो दुपारी. नाचणाऱ्यांच्या धिंगाण्यामुळे दोन्हीकडील पाहुणे मंडळींची गैरसोय होते.इतर समाजापुढे ठेवला आदर्शकोहळी समाजासह काही विशिष्ट समाज आजही लग्न तिथीप्रमाणे वेळेवर लग्नकार्य करीत आहेत. मात्र बहुतांश समाजातील लग्नकार्याची वेळ निश्चित नसते. सद्या जिल्हाभरात लग्नाचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यातच उष्णतेचा पारा ३३ अंशावर पोहोचला आहे. अशा तप्त उन्हात लग्नकार्यात सहभागी होणे पाहुण्यांसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे कोहळी समाजाचा इतर समाजाने आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :marriageलग्न