शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:17 IST

अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देपंचांग औपचारिकता : वऱ्हाड्यांच्या नाचगाण्यांमुळे लग्न तिथीची ऐसीतैसी

प्रदीप बोडणे।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.सनई चौघडाचे मंगल सूर कानी पडताच लग्नाचा मुहूर्त जवळ आला म्हणून वधू मंडळीची एकच धावपळ सुरू होते आणि जानोश्यावर नवरदेव निघाल्याचे वृत्त धडकताच नवदेवाला ओवाळण्यासाठी आणि वराकडील मंडळीच्या स्वागतासाठी पंचआरती घेऊन सुहासिनी सज्ज असतात. परंतु वधू मंडळीला वर पोहोचायला दोन तास वेळ आहे, अशी माहिती मिळते आणि साऱ्यांचा हिरमोड होतो.लग्नपत्रिका, पंचांग मुहूर्त हे सगळे सोपस्कार भावी वधू-वराच्या मांगल्यासाठी असतील तर वराकडील मंडळीच्या नाचगाण्यामुळे लग्न तिथी टाळणे योग्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लग्न तिथीचे तंतोतंत पालन करणारा म्हणून कोहळी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. वरातीतील नाचगाणे कितीही करा, पण मुहूर्त टळू देणार नाही आणि यासाठी कुठलीही सबब सांगू दिल्या जात नाही. वराकडील मंडळीकडून तसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे भोजनावळी आटोपून पाहुणे लग्न मंडळी वेळेवर ईच्छित स्थळी पोहोचणे सोयीचे होते. इतर ठिकाणी लग्नाचा मुहूर्त सकाळी ११ वाजता आणि विवाह लागतो दुपारी. नाचणाऱ्यांच्या धिंगाण्यामुळे दोन्हीकडील पाहुणे मंडळींची गैरसोय होते.इतर समाजापुढे ठेवला आदर्शकोहळी समाजासह काही विशिष्ट समाज आजही लग्न तिथीप्रमाणे वेळेवर लग्नकार्य करीत आहेत. मात्र बहुतांश समाजातील लग्नकार्याची वेळ निश्चित नसते. सद्या जिल्हाभरात लग्नाचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यातच उष्णतेचा पारा ३३ अंशावर पोहोचला आहे. अशा तप्त उन्हात लग्नकार्यात सहभागी होणे पाहुण्यांसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे कोहळी समाजाचा इतर समाजाने आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :marriageलग्न