शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

किन्हाळा/मोहटोलाची पाणी पुरवठा याेजना १९ वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित ...

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागुन नवीन कार्यकारीणी सत्येत आलेली आहे. पाण्याचा यक्ष प्रश्न आत्तातरी सुटणार का? असा प्रश्न जनतेपुढे आहे.

तालुका मुख्यालयापासुन ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्हाळा/मोहटोला येथे सन १९९२ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने किन्हाळा/ मोहटोला गावासाठी ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. ही नळ योजना सुरळीत सुरु ठेवण्यासाठी लगतच्या गाढवी नदीवर बांधलेल्या पाणी साठवणुक विहिरीच्या माध्यमातून मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत होता. सदर नळयोजना १० वर्षे बरोबर चालली . दरम्यान पाईपलाईन फुटणे,वारंवार मोटारपंप बिघडणे यामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची मालिका सुरू झाली होती.

स्थानिक गावकऱ्यांची समस्या लक्षात घेता नळयोजनेच्या दुरस्तीचे काम हाती घेतलेला होता. पण ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होऊ शकली नाही.

गावाची लोकसंख्या आजमितीस दाेन हजारच्या आसपास असुन नळयोजना बंद पडली असल्यापासून गावात बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवल्या जात आहे. बोअरवेलच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने येथील नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. लगतच गाढवी नदी असल्याने बारमाही पाण्याची सोय उपलब्ध असताना तब्बल १९ वर्षापासून नळयोजना बंद असल्याने दरम्यान नळयोजनेला अखेरची घरघर मोजत आहे. बरेच वर्षानंतर सत्तेत परिवर्तन झाल्याने नवीन सरंपच व कार्यकारणी हा पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न हाताळून किन्हाळा मोहटोला येथील पाणीपुरवठा योजना १९ वर्षानंतर सुरु होणार की नाही. नवीन सत्येत आलेल्या पदाधिकारी यांनी हा पाणीप्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा येथील नागरीकांनी व्यक्त केलेली आहे.