शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

किन्हाळा/मोहटोलाची पाणी पुरवठा याेजना १९ वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित ...

देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागुन नवीन कार्यकारीणी सत्येत आलेली आहे. पाण्याचा यक्ष प्रश्न आत्तातरी सुटणार का? असा प्रश्न जनतेपुढे आहे.

तालुका मुख्यालयापासुन ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्हाळा/मोहटोला येथे सन १९९२ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने किन्हाळा/ मोहटोला गावासाठी ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. ही नळ योजना सुरळीत सुरु ठेवण्यासाठी लगतच्या गाढवी नदीवर बांधलेल्या पाणी साठवणुक विहिरीच्या माध्यमातून मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत होता. सदर नळयोजना १० वर्षे बरोबर चालली . दरम्यान पाईपलाईन फुटणे,वारंवार मोटारपंप बिघडणे यामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची मालिका सुरू झाली होती.

स्थानिक गावकऱ्यांची समस्या लक्षात घेता नळयोजनेच्या दुरस्तीचे काम हाती घेतलेला होता. पण ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होऊ शकली नाही.

गावाची लोकसंख्या आजमितीस दाेन हजारच्या आसपास असुन नळयोजना बंद पडली असल्यापासून गावात बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवल्या जात आहे. बोअरवेलच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने येथील नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. लगतच गाढवी नदी असल्याने बारमाही पाण्याची सोय उपलब्ध असताना तब्बल १९ वर्षापासून नळयोजना बंद असल्याने दरम्यान नळयोजनेला अखेरची घरघर मोजत आहे. बरेच वर्षानंतर सत्तेत परिवर्तन झाल्याने नवीन सरंपच व कार्यकारणी हा पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न हाताळून किन्हाळा मोहटोला येथील पाणीपुरवठा योजना १९ वर्षानंतर सुरु होणार की नाही. नवीन सत्येत आलेल्या पदाधिकारी यांनी हा पाणीप्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा येथील नागरीकांनी व्यक्त केलेली आहे.