शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

किडणीग्रस्तांना जीवदान

By admin | Updated: November 4, 2014 22:40 IST

स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले असून या युनिटमधून १० महिन्यात सुमारे ७०० किडणीग्रस्त रूग्णांना जीवदान मिळाले आहे.

७०० रूग्ण : गडचिरोली येथील डायलिसिस युनिटगडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले असून या युनिटमधून १० महिन्यात सुमारे ७०० किडणीग्रस्त रूग्णांना जीवदान मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात दवाखान्यांची संख्या कमी असल्याने रूग्णांचा एकमेव भार स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयावर पडतो. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डिसेंबर २०१३ मध्ये डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले. या युनिटचा लाभ चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नजीकच्या छत्तीसगड राज्यातील रूग्णांना मिळत आहे. इतर रूग्णालयांमध्ये डायलिसिसची सेवा नसल्याने बहुतांश रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयातच येऊन उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे या युनिटमधून बीपीएलधारक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली येथे डायलिसिसची सुविधा उपलब्ध नसताना रूग्णांना नागपूर, पुणे, मुंबई, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागत होता. याही रूग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असला तरी इतर खर्च सर्वसामान्य रूग्णाला झेपने अशक्य होत होते. त्यामुळे बरेचसे रूग्ण उपचार करण्यापेक्षा घरीच त्रास भोगत राहत होते. गडचिरोली येथे डायलिसिसची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे रूग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास वाचण्यासही फार मोठी मदत झाली आहे. डायलिसिस युनिटमधून रूग्णाला गरजेनुसार आठवड्यातून तीन ते चार दिवस नियमितपणे डायलिसिस करून घ्यावे लागते. डायलिसिस या उपचारामध्ये रूग्णाच्या रक्ताचे शुद्धीकरण केल्या जाते. डायलिसिस युनिट डिसेंबर २०१३ स्थापन झाले असले तरी प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१४ मध्ये सुरूवात झाली. जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्याच्या कालावधीमध्ये ७०० डॉयलेसिंस करण्यात आले आहेत. डायलिसिस युनिटच्या या सेवेकरिता रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विनोद गेडाम, अधिपरिचारिका (पुरूष) आशिष पिंपळकर, डायलिसिस तंत्रज्ञ अरूणा ठाकरे, स्रेहल जवंजाळकर, करूणा वाघाडे, कक्षसेवक सुरेश धुर्वे, सफाईगार सागर महातव, नंदेश्वर, केशव कोहपरे आदी कर्तव्य बजावित आहे. डॉयलेसिंस युनिटमुळे अनेक किडणी रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून तत्पर सेवा दिली जात आहे. याचा फायदा दुर्गम व अतिदुर्गम भागातील रूग्णांनाही मिळत आहे. त्यामुळे रूग्णांचे नातेवाईकसुद्धा सेवेवर समाधानी आहेत. (नगर प्रतिनिधी)