शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र

By admin | Updated: September 7, 2016 02:15 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा

पाच वर्षांत लक्षणीय वाढ : १ लाख ८० हजार हेक्टरवर धानाची लागवड; वनपट्टे मिळाल्याचा परिणामगडचिरोली : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा जवळजवळ ११४ टक्के क्षेत्रावर लागवड झाल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला पाठविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००८ पासून मोठ्या प्रमाणावर वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. या वनपट्ट्यावर आता शेती करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामाचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येत आहे. २०१३-१४ मध्ये खरीप हंगामात १ लाख ९३ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली होती. यापैकी १ लाख ७० हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानपीक लागवड करण्यात आले होते. २०१४-१५ मध्ये १ लाख ९९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. त्यांमध्ये १ लाख ७५ हजार ६८० हेक्टर क्षेत्रावर धानाचे पीक घेण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक घेण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. तर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे. या मागे प्रमुख कारण म्हणजे, २००८ मध्ये जंगलावर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचा पट्टा देऊन त्यांना भूमीस्वामी करण्यात आले. त्यामुळे हे लोक आता या पट्ट्यावर शेती करू लागले आहेत. तसेच मागील पाच वर्षांत शासनाकडून राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत पीक कर्जाचे मोठ्या प्रमाणावर वितरण खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवरही मागील तीन-चार वर्षात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात यांत्रिकी शेतीच्या माध्यमातून पिकांची लागवड केली जात आहे. या सर्व कारणांमुळे यावर्षी पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र दोन लाखांच्या वर पोहोचले आहे. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या अनेक शेतमालाची बाजारपेठ गडचिरोलीत उपलब्ध नसतानाही शेतकरी असे पीक घेऊन हा माल इतर प्रांतात व राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवित आहे, हे विशेष. (नगर प्रतिनिधी)