शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव शांततेत पार पाडा

By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST

गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस

जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक : पोलीस अधीक्षकांचे आवाहनगडचिरोली : गणेशोत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये, म्हणून जिल्ह्यातील मंडळांनी गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवारी गडचिरोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. जिल्हास्तरीय शांतता बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, नगराध्यक्ष निर्मला मडके, मुख्याधिकारी रवींद्र ढाके, गडचिरोलीचे ठाणेदार उमेश बेसरकर, आरमोरीचे ठाणेदार महेंद्र मोरे, देसाईगंजचे ठाणेदार अण्णासाहेब मांजरे, न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खेवले, नामदेवराव गडपल्लीवार, सुरेश पद्मशाली उपस्थित होते. जिल्ह्यात शेकडो गणेश मंडळामार्फत गणेशाची स्थापना केली जाते. उत्सवातील १० दिवस दरम्यान गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी संबंधीत गणेश मंडळाची आहे. रात्रीच्या सुमारास गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात सुव्यवस्था राखावी, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शांतता बैठकीदरम्यान सांगितले. गणेशाच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतच्या काळात प्रत्येक गणेश मंडळांनी ध्वनीक्षेपकाची मर्यादा ६० डेसीबलच्या आत ठेवावी, ध्वनीक्षेपकामुळे स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही संदीप पाटील यांनी केले.शांतता बैठकीला जिल्हाभरातून आलेल्या तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, गाव शांतता समितीचे पदाधिकारी व पोलीस पाटलांनी गणेशोत्सवादरम्यान गावात उद्भवणाऱ्या अनेक समस्या पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. यावेळी डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, उत्सवादरम्यान गावात होणारी अवैध दारूविक्री, जुगार यासह अनेक समस्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या. गणेशोत्सवादरम्यान गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला पोलीस अधीक्षकांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रत्युत्तरात दिला. अनुचित प्रकार घडविणाऱ्या मंडळावर १ लाख रूपयाचा दंड व ५ वर्षापर्यंतचा कारावास असल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी शांतता बैठकीदरम्यान दिली. प्रास्ताविकातून एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन पवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)