शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरांसोबत दुर्गम वस्त्यांमधील महिलांना न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

आदिवासी वस्त्यांमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली, चामोर्शी व देसाईगंज या चार ठिकाणी समुपदेश केंद्र आहे. सन २०२०-२१ पासून आजपर्यंत ४६६ तक्रारी आल्या आहेत. मनोधैर्य योजनेतून ११३ पीडितांची नोंद झालेली आहे. पैकी ९२ प्रकरणे मंजूर आहेत. त्यातील ८६ प्रकरणांमध्ये २ कोटी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी खऱ्या अर्थाने सुरक्षित करण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊया. शासन, प्रशासन, पोलीस आणि महिलांच्या विषयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून महिलांवरील अत्याचार रोखता येतील. यासाठी फक्त जनजागृती व लोकप्रतिनिधींनी जनचळवळ उभी करणे अपेक्षित आहे. केवळ शहरीच नाही, तर दुर्गम वस्त्यांमधील महिलांनाही न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी गडचिरोलीत दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपस्थित महिलांना उद्देशून त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे महिला आयोग स्थापन झाल्यापासून गडचिरोली येथे जनसुनावणी घेण्याचा हा पहिलाच योग होता. यावेळी स्वागत समारंभाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीना उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर आयोगाच्या अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जनसुनावणी झाली. आदिवासी वस्त्यांमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली, चामोर्शी व देसाईगंज या चार ठिकाणी समुपदेश केंद्र आहे. सन २०२०-२१ पासून आजपर्यंत ४६६ तक्रारी आल्या आहेत. मनोधैर्य योजनेतून ११३ पीडितांची नोंद झालेली आहे. पैकी ९२ प्रकरणे मंजूर आहेत. त्यातील ८६ प्रकरणांमध्ये २ कोटी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जनसुनावणीदरम्यान,  प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर व अविनाश गुरनुले यांनी तर संचालन प्रियंका आसूरकर यांनी केले. 

१०२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे १३२ प्राप्त प्रकरणांमध्ये २३ मंजूर आणि १३ नामंजूर करण्यात आले. मात्र, १०२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ती का प्रलंबित आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे यावेळी चाकणकर यांनी सांगितले. उर्वरित १४ प्रकरणांत यापूर्वीच १७ लक्ष ५० हजार रुपये अर्थसहाय्य अदा केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

‘शक्ती’ कायद्याला मंजुरी मिळेलआयोगाच्या अध्यक्षांनी जनसुनावणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाच्या उपक्रमांबाबत व गडचिरोलीतील महिला तक्रारींबाबत माहिती दिली. राज्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात आहे. गेल्या काही काळात कोरोनामुळे महिलांवरील अत्याचार, बालविवाह जास्त झाल्याची नोंद आहे. याचे कारण अर्थिक अडचणी, नैराश्य असल्याचे आढळून येत आहे. यासाठी  समुपदेशन केंद्र प्रशासनाच्या मदतीने गतीने कार्य करीत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शक्ती या नवीन कायद्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

११४ तक्रारी दाखल, २ मध्ये समझोता-    गडचिरोलीत जनसुनावणीत ११४ वेगवेगळी प्रकरणे दाखल झाली. त्यामध्ये महिला तक्रार निवारण केंद्राच्या ५० तक्रारी होत्या, तर कोरोना काळात एकल विधवा  महिलांच्या विविध योजना व सानुग्रह अनुदान याबाबत ६४ तक्रारी होत्या.  तसेच वात्सल्य योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडविण्यासाठी संबंधितास सूचना करण्याचे आश्वासन दिले. प्राप्त   प्रकरणांतील २ प्रकरणांत समझोता करण्यात यश आले. तसेच ८ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. 

 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर