शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

न्यायदान प्रक्रिया सुरळीत व्हावी

By admin | Updated: January 15, 2017 01:29 IST

कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी,

भूषण गवई : न्यायालय इमारतीचे उद्घाटन कुरखेडा : कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कुरखेडा येथील दिवाणी न्यायालयाच्या नव निर्मित इमारतीचे उद्घाटन शनिवारी न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, कुरखेडाचे प्रभारी दिवाणी न्यायाधीश कु. रा. सिंघेल, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद बुध्दे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासीक व धार्मिक स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसला जाईल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी ज्यासाठी कुरखेडा येथे न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाले. तो हेतू साध्य झाला पाहिजे. सकारात्मक मानसिक ठेवून येथील न्यायप्रक्रिया गतीमान करावी, असे आवाहन न्यायमूर्ती देशमुख यांनी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इमारत बांधकाम केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, कार्यकारी अभियंता बूग, कंत्राटदार कमलेश पटेल, उपविभागीय अभियंता सुनिल मार्लीवार, शाखा अभियंता अजय चहांदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान यांनी साकारलेल्या गडचिरोली अ‍ॅप व यूजर मॅन्युअल या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार न्यायाधीश सिंघेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)३०८ खटले प्रलंबित कुरखेडा येथील ०.८० हेक्टर भूखंडावर चार कोटी रूपये खर्च करून न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. कुरखेडाच्या न्यायालयात दिवाणी ५२ व फौजदारी २५६ असे एकूण ३०८ खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रास्ताविकेतून वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद बुध्द यांनी यावेळी दिली.