शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बस आगारात जलबचतीचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 01:46 IST

राज्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जलजागृती करण्याकरिता ‘लोकमत’ने सुरू केलेल्या...

पाण्याची काटकसर करा : अधिकारी, चालक, वाहक सरसावलेगडचिरोली : राज्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जलजागृती करण्याकरिता ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात जिल्ह्यात प्रशासनाचे सहकार्य लाभत असतानाच गडचिरोली बस आगारानेही पुढाकार घेतला आहे. चालक, वाहक, अधिकारी यांच्यासह प्रवाशांनीही पुढाकार घेत मंगळवारी बस आगारात आयोजित जलमित्र कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जलबचतीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या काही भागात तीव्र आहे. मात्र बहुतांश भागात पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु भविष्यातही मुबलक पाणी राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे पाणी मुबलक असतानाही पाण्याचा काटकसरीने वापर व पुनर्वापर करण्याकरिता नागरिकांमध्ये जलजागृती आवश्यक आहे. या हेतूने लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र अभियानास गडचिरोली आगारात मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी बस आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुभाष राठोड यांनी बस आगारात पाणी वापराबाबत व बचतीबाबत महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या. पाण्याचा योग्य वापर हीच पाण्याची बचत आहे. बस आगारातील विविध विभागात पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. याकरिता आगारातील कर्मचारी व अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पाण्याच्या बचतीसाठी स्वत: पुढाकार घेऊन इतरांनाही पाणी बचतीचे आवाहन आगारामार्फत केले जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. यावेळी बस आगारातील अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)पाणपोईसाठी एक व्यक्तीपाणपोईच्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात होत असतो. आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी ग्लासमध्ये घेतले जाते व उर्वरित पाणी तसेच फेकून दिले जाते. परंतु आगारामध्ये लावण्यात आलेल्या पाणपोईच्या स्थळी एका खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर व्यक्ती यावर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होत आहे. शिवाय प्रवाशांमध्येही पाण्याच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. एकूणच, पाणी बचतीसाठी बस आगारानेही पुढाकार घेतला आहे.