शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

बस आगारात जलबचतीचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 01:46 IST

राज्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जलजागृती करण्याकरिता ‘लोकमत’ने सुरू केलेल्या...

पाण्याची काटकसर करा : अधिकारी, चालक, वाहक सरसावलेगडचिरोली : राज्यातील भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जलजागृती करण्याकरिता ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात जिल्ह्यात प्रशासनाचे सहकार्य लाभत असतानाच गडचिरोली बस आगारानेही पुढाकार घेतला आहे. चालक, वाहक, अधिकारी यांच्यासह प्रवाशांनीही पुढाकार घेत मंगळवारी बस आगारात आयोजित जलमित्र कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जलबचतीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या काही भागात तीव्र आहे. मात्र बहुतांश भागात पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु भविष्यातही मुबलक पाणी राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे पाणी मुबलक असतानाही पाण्याचा काटकसरीने वापर व पुनर्वापर करण्याकरिता नागरिकांमध्ये जलजागृती आवश्यक आहे. या हेतूने लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र अभियानास गडचिरोली आगारात मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी बस आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुभाष राठोड यांनी बस आगारात पाणी वापराबाबत व बचतीबाबत महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या. पाण्याचा योग्य वापर हीच पाण्याची बचत आहे. बस आगारातील विविध विभागात पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. याकरिता आगारातील कर्मचारी व अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पाण्याच्या बचतीसाठी स्वत: पुढाकार घेऊन इतरांनाही पाणी बचतीचे आवाहन आगारामार्फत केले जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. यावेळी बस आगारातील अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)पाणपोईसाठी एक व्यक्तीपाणपोईच्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात होत असतो. आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी ग्लासमध्ये घेतले जाते व उर्वरित पाणी तसेच फेकून दिले जाते. परंतु आगारामध्ये लावण्यात आलेल्या पाणपोईच्या स्थळी एका खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर व्यक्ती यावर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होत आहे. शिवाय प्रवाशांमध्येही पाण्याच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. एकूणच, पाणी बचतीसाठी बस आगारानेही पुढाकार घेतला आहे.