शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिवाळीचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:03 IST

राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.

ठळक मुद्दे१० टक्के हंगामी वाढ : १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान तिकीटचे दर वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.बहूतांश नागरिक दिवाळी सण आपल्या मूळगावी आप्तेष्टांसोबत साजरा करतात. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाºयांची संख्या वाढते. वाढलेल्या गर्दीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने साधी, जलद, रात्रसेवा बसेसच्या तिकीटात १० टक्के वाढ केली आहे. तर निमआरामच्या तिकीटात १५ टक्के व वातानुकूलीत बसच्या तिकीटात २० टक्के वाढ केली आहे. गडचिरोली विभागातील अहेरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी या तीन आगारातील बसेस दरदिवशी ८८ हजार किमी धावतात. त्यापासून विभागाला दरदिवशी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीच्या हंगामात दरदिवशी तीन हजार किमीची भर पडेल. यासाठी एसटी विभागाने नियोजन केले आहे. त्याचबरोबर दरदिवशी २१ लाख रूपये उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तीन कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे.दिवाळी सणादरम्यान येणाºया भाऊबिज सणामुळेही प्रवाशांची गर्दी वाढते. गडचिरोली जिल्ह्यात खासगी वाहनांची संख्या कमी असल्याने स्थानिक प्रवाशांनाही बसवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील बसफेºयांबरोबरच जिल्ह्याअंतर्गतच्या फेºया वाढविण्याचेही नियोजन गडचिरोली विभागाने केले आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यान भाववाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मुख्य मार्गावर अधिक भरचंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी मुख्य मार्गांवर गर्दी राहत असल्याने या मार्गांवर अधिकाधिक फेºया चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, आष्टी, सिरोंचा आदी मार्गांवरही बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस यासाठी कामी येणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक एसटीला भाववाढ केली असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांनाही भाववाढीचा चटका सहन करावा लागणार आहे. वाढीव फेºयांमुळे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.चंद्रपूर मार्गावर यापूर्वी ४० बसफेºया जलद व १७ बसफेºया सर्वसाधारण होत्या. मात्र प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ४९ बसफेºया सर्वसाधारण केल्या असून ८ बसफेºया जलद आहेत.