शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:03 IST

राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.

ठळक मुद्दे१० टक्के हंगामी वाढ : १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान तिकीटचे दर वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.बहूतांश नागरिक दिवाळी सण आपल्या मूळगावी आप्तेष्टांसोबत साजरा करतात. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाºयांची संख्या वाढते. वाढलेल्या गर्दीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने साधी, जलद, रात्रसेवा बसेसच्या तिकीटात १० टक्के वाढ केली आहे. तर निमआरामच्या तिकीटात १५ टक्के व वातानुकूलीत बसच्या तिकीटात २० टक्के वाढ केली आहे. गडचिरोली विभागातील अहेरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी या तीन आगारातील बसेस दरदिवशी ८८ हजार किमी धावतात. त्यापासून विभागाला दरदिवशी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीच्या हंगामात दरदिवशी तीन हजार किमीची भर पडेल. यासाठी एसटी विभागाने नियोजन केले आहे. त्याचबरोबर दरदिवशी २१ लाख रूपये उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तीन कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे.दिवाळी सणादरम्यान येणाºया भाऊबिज सणामुळेही प्रवाशांची गर्दी वाढते. गडचिरोली जिल्ह्यात खासगी वाहनांची संख्या कमी असल्याने स्थानिक प्रवाशांनाही बसवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील बसफेºयांबरोबरच जिल्ह्याअंतर्गतच्या फेºया वाढविण्याचेही नियोजन गडचिरोली विभागाने केले आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यान भाववाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मुख्य मार्गावर अधिक भरचंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी मुख्य मार्गांवर गर्दी राहत असल्याने या मार्गांवर अधिकाधिक फेºया चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, आष्टी, सिरोंचा आदी मार्गांवरही बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस यासाठी कामी येणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक एसटीला भाववाढ केली असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांनाही भाववाढीचा चटका सहन करावा लागणार आहे. वाढीव फेºयांमुळे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.चंद्रपूर मार्गावर यापूर्वी ४० बसफेºया जलद व १७ बसफेºया सर्वसाधारण होत्या. मात्र प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ४९ बसफेºया सर्वसाधारण केल्या असून ८ बसफेºया जलद आहेत.