शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

काळागोटा मार्गावरून चिखल व खड्ड्यातून सुरू आहे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्दे आरमोरी नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष : पाच वर्षापूर्वी केलेले डांबरीकरण अल्पावधीत उखडल्याने वाहनधारकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून काळागोटा वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारक व पादचाऱ्यांना चिखल व खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते व त्यामुळे या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डबक्यांमुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्गालगत असलेल्या घरातील नागरिकांना दिवस-रात्र घरासमोरील चिखल तुडवित वाट काढावी लागते. या मार्गावरील नरेंद्र निंबेकर यांच्या घरासमोर संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता नेमका कोणत्या बाजूने चांगला आहे हे कळायला मार्ग नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची अशीच स्थिती असते.गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे खोल असल्याने खड्ड्यातील पाणी वाहून जात नाही. संपूर्ण रस्ता चिखलाने माखला असल्याने पादचाºयांना चिखल तुडवित आवागमन करावे लागत आहे. दिवसभर या रस्त्यावर लोकांचे आवागमन सुरू असते. मात्र न. प.चे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी काळागोटा परिसरातील नागरिकांनी केली आहे.नवेगावच्या साईनगरात चिखलाचे साम्राज्यगडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील साईनगर वॉर्डातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलाच्या रस्त्याने जाताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने या वॉर्डात कच्चा रस्ता तयार केला. या मार्गावर एचपी गॅसचे गोदाम आहे. या गोदामात ट्रकने सिलिंडर नेले जातात. वजनी ट्रकमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच चिखलही निर्माण झाले आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची रिपझिप सुरू आहे. यामुळे चिखलाचे प्रमाण आणखी वाढले आहे. चिखल एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे की, पायदळ चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाने नियोजन करून रस्ता दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक