शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

भामरागड-कोठी मार्गाचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:28 IST

भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे.

ठळक मुद्देडांबरीकरण उखडले : खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली; १७ वर्षांपासून मार्गाची पक्की दुरूस्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात अद्यापही कायम आहेत. प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कोठी परिसर विकासापासून आजही कोसोदूर आहे. त्यातल्या त्यात भामरागड-कोठी या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गाचा नागरिकांचा प्रवास खडतर बनला आहे.रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डे बुजवून रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सन १९९९-२००० या आर्थिक वर्षात प्रशासनाच्या वतीने कोठी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र तेव्हापासूून या रस्त्याची आजवर एकदाही पक्की दुरूस्ती करण्यात आली नाही. सदर मार्गाच्या निर्मितीला आज १७ वर्ष पूर्ण होत असले तरी या रस्त्याच्या पुनर्जीवनाकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याचे कामही त्यावेळी दर्जेदार झाले नाही. त्यामुळे २०१२ मध्येच हा रस्ता पुरामुळे वाहून गेला. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने हे खड्डे चुकवित वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे पूलही बांधण्यात आले आहे. मात्र नाल्यावरील जुन्या पुलाच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्य्ोाने चार-पाच वर्षांत पुरामुळे अनेक लहान पूल वाहूून गेले आहेत. भामरागड-कोठी मार्गाची अवस्था दयनिय झाल्याने या मार्गावरील महामंडळाची बसफेरी बंद होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी अनेकदा बसफेरी बंद झाली होती.प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भामरागड भागात पोहोचेनाभामरागड-कोठी या मार्गाची गतवर्षीही प्रचंड दूरवस्था झाली होती. कोठी पोलीस मदत केंद्राच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मार्गावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले होते. तसेच महामंडळाची बसफेरी सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावाही करण्यात आला. त्यामुळे सध्या या मार्गावर बसफेरी सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास कोठी मार्गाची पूर्णत: वाट लागणार आहे. खासगी वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे.एका गावाला दुसरे गाव व एका शहराला दुसरे शहर जोडण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे शहरी भागात केली जात आहेत. मात्र भामरागड तालुक्यात गरज असूनही कोठीे मार्गाचे काम या योजनेतून मंजूर करण्यात आले नाही. सदर दोन्ही योजना या भागात पोहोचल्याच नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRainपाऊस