शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. देसाईगंज येथील न्यायालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी आयोजित लोक न्यायालयात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख ॲड. मो. तारीक सौदागर, सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम डेंगानी, ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरु, ॲड. ज्युईली व्ही. मेश्राम, ॲड. दत्तू पिलारे, ॲड. लाँगमार्च खोब्रागडे आदी उपस्थित होते.समाजाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी निकोप वातावरण निर्मिती अत्यावश्यक आहे. सद्भावनेने वागल्यास असे वातावरण निर्माण करणे शक्य आहे, असे अधिवक्ता संजय गुरु यांनी सांगितले. यावेळी न्यायालयीन सभागृहात आयोजित लोक न्यायालयात अनेक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. यशस्वीतेसाठी लघुलेखक संजय मुन, वरिष्ठ लिपीक उमेश सुपराळे, मुकेश कावळे, अधीक्षक अनिल आमटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक रवी माणुसमारे, प्रवीण मेश्राम, डि. व्ही. महाजन, आर.पी.कामटकर, व्हि. टी. नंदगीरवार, टि .के.चालुरकर, देवदत्त सहारे, राकेश बिरा व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत