शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. देसाईगंज येथील न्यायालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी आयोजित लोक न्यायालयात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख ॲड. मो. तारीक सौदागर, सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम डेंगानी, ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरु, ॲड. ज्युईली व्ही. मेश्राम, ॲड. दत्तू पिलारे, ॲड. लाँगमार्च खोब्रागडे आदी उपस्थित होते.समाजाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी निकोप वातावरण निर्मिती अत्यावश्यक आहे. सद्भावनेने वागल्यास असे वातावरण निर्माण करणे शक्य आहे, असे अधिवक्ता संजय गुरु यांनी सांगितले. यावेळी न्यायालयीन सभागृहात आयोजित लोक न्यायालयात अनेक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. यशस्वीतेसाठी लघुलेखक संजय मुन, वरिष्ठ लिपीक उमेश सुपराळे, मुकेश कावळे, अधीक्षक अनिल आमटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक रवी माणुसमारे, प्रवीण मेश्राम, डि. व्ही. महाजन, आर.पी.कामटकर, व्हि. टी. नंदगीरवार, टि .के.चालुरकर, देवदत्त सहारे, राकेश बिरा व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत