शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आपल्याच सवयी ठरतात मेंदूला घातक

By admin | Updated: November 15, 2014 22:47 IST

तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व

गडचिरोली : तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व शोधांचे सगळे श्रेय मेंदूलाच जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मेंदूला जपताना कुठेतरी मागे पडताना दिसून येतो. हृदय, किडनी, डोळे इतकेच काय पण नखांनादेखील त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो.मात्र खरेच किती जण आपला मेंदूदेखील निरोगी राहावा यासाठी प्रयत्न करतात? न्यूरोसर्जन्सचे तर हे मत आहे की प्रत्येकाला आपल्या मेंदूला कशामुळे त्रास होऊ शकतो व त्यापासून रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या सवयी कधी कधी मेंदूच्या समस्येला आमंत्रण देत असतात. मेंदूला नुकसानकारक असणाऱ्या आपल्या सवयीनाश्ता टाळणे : अनेक जणांची ही धारणा असते की सकाळी नाश्ता केल्याने पोटातील भूक कमी होते व त्याचा परिणाम जेवणावर होतो. मात्र आदल्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यापासून पोटात काहीही नसते. त्यामुळे ब्लडशुगरची पातळी खालावण्याचा धोका असतो. जर पातळी खाली गेली तर मेंदूला हवे असलेले घटक मिळत नाही आणि त्यामुळे मेंदूचे विकार होऊ शकतात.अतिप्रमाणात खाणे : कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात खाणे हे चुकीचेच आहे. यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर प्रतिकूल परिणाम होऊन विचार शक्तीची क्षमता कमी होऊ शकते.धूम्रपान : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि यामुळे अल्झेमर हा आजार होऊ शकतो.जास्त गोड खाणे : अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने प्रथिने आणि पोषक द्रव्ये पूर्णपणे शोषल्या जात नाहीत व त्यामुळे कुपोषणाची शक्यता निर्माण होते. जर असे झाले तर मेंदूच्या विकास थांबतो.हवेचे प्रदूषण : आपल्या शरीरात सर्वात जास्त प्राणवायू हा मेंदूला लागतो. जर सातत्याने प्रदूषणयुक्त हवेत श्वसन झाले तर मेंदूला योग्य प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नाही. मेंदूची कार्यक्षमता यामुळे कमी होते.निद्रानाश : ज्यावेळी एखादी व्यक्ती झोपली असते तेव्हा मेंदूलादेखील आराम मिळतो. मात्र जर निद्रानाशाचा विकार जडला असेल किंवा बरेच दिवस कमी झोप घेतली तर मेंदूच्या पेशी नष्ट होतात.डोक्यावरून चादर घेणे : रात्री झोपताना जर डोक्यावरून जाड चादर घेतली तर प्राणवायूचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही आणि कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जास्त विचार करणे : जर एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब असेल आणि त्यादरम्यान जास्त प्रमाणात वैचारिक काम झाले किंवा अति अभ्यास केला तर मेंदूच्या नसांवर ताण येऊ शकतो. (शहर प्रतिनिधी)