शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सिंचन योजना ठरली शोेभेची

By admin | Updated: September 28, 2015 01:44 IST

तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही.

वेलतूर (तुकूम) येथील उपसा योजना : पाच वर्षांपासून सिंचाई विभागाचे होत आहे दुर्लक्षचामोर्शी : तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला असून सदर योजना केवळ शोभेची वस्तू बनली असल्याची टीका वेलतूर (तुकूम) चे सरपंच दिगंबर धानोकर यांनी केली आहे. वेलतूर तुकूम परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र जलसिंचनाच्या सुविधेअभावी धानाचे पीक एका पाण्याने करपत होते. गावालगत तलाव असला तरी या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपसा सिंचन योजना बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाने या ठिकाणी उपसा सिंचन योजना मंजूर केली. गावाजवळच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. या नदीचे पाणी तलावामध्ये टाकणे व तलावाचे पाणी नहराच्या माध्यमातून जवळपासच्या शेतीला पोहोचविणे अशी ही योजना होती. या योजनेमुळे परिसरातील अडीचशे ते तिनशे एकर जमिनीला लाभ होणार होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना तयार केली गेली. नदीच्या पात्रात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचबरोबर काठावर स्वीचरूम बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. या योजनेवर आजपर्यंत लाखो रूपये खर्च करण्यात आले. तरीही या उपसा सिंचन योजनेमुळे धानाची एक बांधीसुध्दा ओलिताखाली आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाणी योजना सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, पाणी वाटप संस्था तयार करा त्यानंतरच योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची संस्था निर्माण न करताच उपसा सिंचन योजना मंजूर कशी केली व कामे कशी पूर्ण केली, असा प्रश्न सरपंच दिगंबर धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी या गावातील तलाव अर्धवटच भरला आहे. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी धान पिकाच्या रोवणीला उशिर झाला आहे. उपसा सिंचन योजना सुरू झाली असती तर रोवण्याची कामे अगदी वेळेवर होऊन शेतकऱ्यांना थोडेफार अधिकचे उत्पन्न झाले असते. सदर योजनेकडे आमदारांनी लक्ष घालून योजना सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)