शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजना ठरली शोेभेची

By admin | Updated: September 28, 2015 01:44 IST

तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही.

वेलतूर (तुकूम) येथील उपसा योजना : पाच वर्षांपासून सिंचाई विभागाचे होत आहे दुर्लक्षचामोर्शी : तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला असून सदर योजना केवळ शोभेची वस्तू बनली असल्याची टीका वेलतूर (तुकूम) चे सरपंच दिगंबर धानोकर यांनी केली आहे. वेलतूर तुकूम परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र जलसिंचनाच्या सुविधेअभावी धानाचे पीक एका पाण्याने करपत होते. गावालगत तलाव असला तरी या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपसा सिंचन योजना बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाने या ठिकाणी उपसा सिंचन योजना मंजूर केली. गावाजवळच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. या नदीचे पाणी तलावामध्ये टाकणे व तलावाचे पाणी नहराच्या माध्यमातून जवळपासच्या शेतीला पोहोचविणे अशी ही योजना होती. या योजनेमुळे परिसरातील अडीचशे ते तिनशे एकर जमिनीला लाभ होणार होता. शासनाने मंजुरी दिल्यानंतर वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना तयार केली गेली. नदीच्या पात्रात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचबरोबर काठावर स्वीचरूम बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. या योजनेवर आजपर्यंत लाखो रूपये खर्च करण्यात आले. तरीही या उपसा सिंचन योजनेमुळे धानाची एक बांधीसुध्दा ओलिताखाली आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाणी योजना सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, पाणी वाटप संस्था तयार करा त्यानंतरच योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची संस्था निर्माण न करताच उपसा सिंचन योजना मंजूर कशी केली व कामे कशी पूर्ण केली, असा प्रश्न सरपंच दिगंबर धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. यावर्षी या गावातील तलाव अर्धवटच भरला आहे. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी धान पिकाच्या रोवणीला उशिर झाला आहे. उपसा सिंचन योजना सुरू झाली असती तर रोवण्याची कामे अगदी वेळेवर होऊन शेतकऱ्यांना थोडेफार अधिकचे उत्पन्न झाले असते. सदर योजनेकडे आमदारांनी लक्ष घालून योजना सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)